जो सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होतो, त्या ईश्वरा, तुझा जयजयकार असो.
आम्हास असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट तुझ्या कार्यात अडसर ठरू नये.
आम्हास असे वरदान दे की, कोणत्याही गोष्टीमुळे तुझ्या आविष्करणामध्ये विलंब होणार नाही.
आम्हास असे वरदान दे की, प्रत्येक क्षणी, सर्व गोष्टींमध्ये तुझीच इच्छा कार्यरत होईल.
तुझ्या मन:संकल्पाची परिपूर्ती आमच्यामध्ये होऊ दे, आमच्या प्रत्येक घटकामध्ये, आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कृतीमध्ये, आमच्या सर्वोच्च उंचीपासून ते आमच्या देहाच्या अगदी सूक्ष्मतम अशा पेशींपर्यंत तुझीच इच्छा पूर्णत्वाला जाऊ दे, यासाठी आम्ही तुझ्यासमोर उभे आहोत.
आम्हास असे वरदान दे की, आम्ही तुझ्याप्रत कायमच पूर्णपणे एकनिष्ठ राहू.
आम्हास असे वरदान दे की, इतर कोणताही प्रभाव वगळून, आम्ही पूर्णत: तुझ्याच प्रभावाला खुले राहू.
आम्हास असे वरदान दे की, आम्ही तुझ्याप्रत एक गहन आणि उत्कट कृतज्ञता बाळगण्यास कधीही विसरणार नाही.
आम्हास असे वरदान दे की, तुझ्याकडून प्रसादरूपाने, हरघडी मिळणाऱ्या अद्भुत गोष्टींचा आमच्याकडून कधीही अपव्यय होणार नाही.
आम्हास असे वरदान दे की, आमच्यामधील सर्व गोष्टी तुझ्या कार्यात सहभागी होतील आणि तुझ्या साक्षात्कारासाठी सज्ज होतील.
सर्व साक्षात्कारांच्या परमोच्च स्वामी असणाऱ्या हे ईश्वरा, तुझा जयजयकार असो. आम्हाला तुझ्या विजयाबद्दलची सक्रिय आणि उत्कट, परिपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर.
– श्रीमाताजी
(CWM 01 : 382)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…