ज्याला तुझी सेवा करण्यासाठी पात्र बनायचे आहे त्याने कशालाच चिकटून राहता कामा नये, अगदी ज्या कामकाजामुळे त्याला तुझ्याशी अधिकाधिक जाणीवपूर्वकतेने संपर्क साधता येतो अशा कामकाजाची देखील त्याने आसक्ती बाळगता कामा नये.
आणि समग्र परिस्थितीचा परिणाम म्हणून, जर त्याच्या जीवनातील बरीचशी जागा ही नेहमीपेक्षाही अधिक भौतिक गोष्टींनी व्यापली जात असेल, तर त्यामध्ये त्याने गुंतून कसे पडू नये आणि त्याच्या हृदयाच्या अंतर-हृदयामध्ये त्याने तुझ्या अस्तित्वाची स्पष्ट जाण कशी बाळगावी आणि कशानेही विचलित होऊ शकणार नाही अशा त्या प्रगाढ शांतीमध्ये सतत कसे राहावे, हे त्याला माहीत असले पाहिजे.
हे प्रभो, सर्व गोष्टींमध्ये, तसेच सर्वत्र तुझेच दर्शन घेत कार्य करणे आणि अशा पद्धतीने कृती केली जात असल्यामुळे – एरवी बंदिवान म्हणून आपल्याला पृथ्वीशी जखडून ठेवणाऱ्या बेड्या न पडता – त्या कृतीच्या कितीतरी वर जाऊन झेपावणे…
हे प्रभो, मी जे तुला माझ्या अस्तित्वाचे अर्पण करत आहे ते अधिकाधिक परिणामकारक आणि समग्र ठरावे, असा आशीर्वाद दे.
हे अनिर्वचनीय सारतत्त्वा, अकल्पनीय सत्यरूपा, अनाम एकमेवाद्वितीया, अत्यंत आदराने आणि प्रेमपूर्ण भक्तीने मी, तुझ्यासमोर नतमस्तक होत आहे.
– श्रीमाताजी
(CWM 01 : 84)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…