माझ्या सगळ्या भौतिक जबाबदाऱ्या संपल्या रे संपल्या की, त्याबाबतचे सर्व विचार माझ्या मनातून पार नाहीसे होतात आणि मग मी केवळ आणि समग्रतया तुझ्या विचारांनी व्याप्त होते, तुझ्या सेवेमध्ये निमग्न होते. आणि मग एका गभीर शांतीमध्ये आणि प्रसन्नतेमध्ये, माझी इच्छा तुझ्या इच्छेशी एकरूप करते आणि त्या परिपूर्ण शांतीमध्ये मी तुझे सत्य ऐकते, त्या सत्याची अभिव्यक्ती ऐकते. तुझ्या इच्छेविषयी जागृत होण्याने आणि आपली इच्छा त्याच्या इच्छेशी एकरूप करण्यामध्येच खऱ्याखुऱ्या स्वतंत्रतेचे आणि सर्वशक्तिमानतेचे रहस्य सापडते; शक्तीच्या पुनरुज्जीवनाचे आणि जीवाच्या रूपांतरणाचे रहस्यही त्यामध्येच सापडते.
तुझ्याशी सदोदित व समग्रतया एकत्व पावलेले असण्यामध्येच – आम्ही आतील आणि बाहेरील, सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो, सर्व संकटांवर विजय मिळवू शकतो – ह्याची खात्री सामावलेली आहे.
हे ईश्वरा, माझे हृदय असीम आनंदाने भरून गेले आहे, माझ्या मस्तकामध्ये आनंदगानाच्या अद्भुत लाटाच जणु उसळत आहेत आणि तुझ्या निश्चित विजयाच्या पूर्ण खात्रीमध्येच मला सार्वभौम शांती आणि अजेय शक्ती अनुभवास येत आहे. तू माझ्या सर्व अस्तित्वामध्ये भरून गेला आहेस, तूच त्यामध्ये संजीवन आणतोस, माझ्या अस्तित्वामधील दडलेले झरे तूच प्रवाहित करतोस, तू माझ्या आकलनास उजाळा देतोस, तू माझे जीवन उत्कट बनवितोस, तू माझ्यामधील प्रेमाची दसपटीने वृद्धी करतोस, आणि आता मला हे उमगत नाही की, हे ब्रह्मांड म्हणजे मी आहे की, मी हे ब्रह्मांड आहे. मला हे उमगत नाही की, तू माझ्यामध्ये आहेस की, मी तुझ्यामध्ये आहे; आता केवळ तूच आहेस; सारे काही तूच आहेस आणि तुझ्या अनंत कृपेच्या प्रवाहाने हे विश्व भरून, ओसंडून वाहत आहे.
भूमींनो, गान करा. लोकांनो, गान करा. मानवांनो, गान करा. तिथे दिव्य सुसंवाद अस्तित्वात आहे.
– श्रीमाताजी
(CWM 01 : 19)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…