शांतपणे तेवणाऱ्या एखाद्या ज्योतीप्रमाणे, कोणतीही वेडीवाकडी वळणे न घेता, सरळ वर जाणाऱ्या सुगंधाप्रमाणे, माझे प्रेम सरळ तुझ्याप्रत जात आहे आणि एखाद्या बालकाप्रमाणे, कोणत्याही तार्किकतेविना, किंवा कोणत्याही काळजीविना, मी तुझ्याप्रत असा विश्वास बाळगत आहे की, तुझा मानस प्रत्यक्षात उतरेल, तुझा प्रकाश उजळून येईल, तुझी शांती सर्वत्र प्रसृत होईल. आणि तुझे प्रेम विश्वावर पांघरले जाईल. जेव्हा तुझी इच्छा असेल की, मी तुझ्यामध्ये असावे, मी तूच व्हावे तेव्हा मग आपल्यामध्ये कोणताही भेद उरलेला नसेल. त्या कृपांकित क्षणांची मी कोणत्याही अधीरतेविना वाट पाहत आहे; एखादा शांतपणे वाहणारा झरा जसा असीम सागराकडे प्रवाहित होत असतो, तशीच मी स्वत:ला त्या क्षणांप्रत अप्रतिहतपणे जाऊ देत आहे.
तुझी शांती माझ्यामध्ये आहे आणि त्या शांतीमध्ये मी हे पाहत आहे की, या अवघ्या चराचरात एकमेव तूच विद्यमान आहेस, तू सर्वत्र चिरकालाच्या स्थिरतेनिशी निवास करत आहेस.
– श्रीमाताजी
(CWM 01 : 11)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…