पूर्णयोग आणि बौद्धमत – २१
धम्मपद : भयभीत होऊन माणसं पर्वतराजींमध्ये, अरण्यामध्ये, वनराजींमध्ये, मठमंदिरांमध्ये, ठिकठिकाणी आश्रय घेतात.
पण हा सुरक्षित आश्रय नाही, हा सर्वोच्च आश्रय नाही. ह्या आश्रयस्थानी येऊनही माणसाचा दु:खभोगापासून बचाव होऊ शकत नाही.
जो बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा पूर्णज्ञानानिशी आश्रय घेतो, त्याला चार उदात्त तत्त्वांचा बोध होतो –
१) दुःखभोग २) दुःखभोगाचे मूळ ३) दु:खभोगाची समाप्ती आणि ४) या समाप्तीकडे घेऊन जाणारा अष्टपदी मार्ग
वास्तविक, हे खरे खात्रीचे आश्रयस्थान आहे, हे सर्वोच्च आश्रयस्थान आहे. ह्या आश्रयाची निवड करणे म्हणजे सर्व दुःखभोगापासून मुक्त होणे.
श्रीमाताजी : दु:खभोगाची समाप्ती ज्यामधून घडून येईल त्या चार तत्त्वांशी आणि अष्टपदी मार्गाशी हे वचन संबंधित आहे.
चार उदात्त तत्त्वे पुढीलप्रमाणे :
१) ज्या सामान्य अर्थाने जीवन या शब्दाचा अर्थ घेतला जातो ते जीवन अज्ञानाचे आणि मिथ्यत्वाचे जीवन आहे. ते देहाच्या व मनाच्या दुःखभोगाशी अतूटपणे जोडले गेलेले आहे.
२) वासना हे दुःखभोगाचे मूळ आहे, विभक्त जीवनाच्या स्वरूपाबद्दलचे अज्ञान हे वासनांचे मूळ आहे.
३) दुःखभोगापासून सुटका करून घेण्याचा, वेदनांचा अंत करण्याचा एक मार्ग आहे.
४) अष्टपदी मार्गाच्या आचरणाने हळूहळू मनाची अज्ञानापासून शुद्धी होत जाते आणि त्यातून ही मुक्ती प्राप्त होते. ह्या चौथ्या सत्याला अष्टपदी मार्गाची पद्धत असे संबोधले जाते.
(अष्टपदी मार्ग उद्याच्या भागात…)
– श्रीमाताजी
(CWM 03 : 248)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…