पूर्णयोग आणि बौद्धमत – २१
धम्मपद : भयभीत होऊन माणसं पर्वतराजींमध्ये, अरण्यामध्ये, वनराजींमध्ये, मठमंदिरांमध्ये, ठिकठिकाणी आश्रय घेतात.
पण हा सुरक्षित आश्रय नाही, हा सर्वोच्च आश्रय नाही. ह्या आश्रयस्थानी येऊनही माणसाचा दु:खभोगापासून बचाव होऊ शकत नाही.
जो बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा पूर्णज्ञानानिशी आश्रय घेतो, त्याला चार उदात्त तत्त्वांचा बोध होतो –
१) दुःखभोग २) दुःखभोगाचे मूळ ३) दु:खभोगाची समाप्ती आणि ४) या समाप्तीकडे घेऊन जाणारा अष्टपदी मार्ग
वास्तविक, हे खरे खात्रीचे आश्रयस्थान आहे, हे सर्वोच्च आश्रयस्थान आहे. ह्या आश्रयाची निवड करणे म्हणजे सर्व दुःखभोगापासून मुक्त होणे.
श्रीमाताजी : दु:खभोगाची समाप्ती ज्यामधून घडून येईल त्या चार तत्त्वांशी आणि अष्टपदी मार्गाशी हे वचन संबंधित आहे.
चार उदात्त तत्त्वे पुढीलप्रमाणे :
१) ज्या सामान्य अर्थाने जीवन या शब्दाचा अर्थ घेतला जातो ते जीवन अज्ञानाचे आणि मिथ्यत्वाचे जीवन आहे. ते देहाच्या व मनाच्या दुःखभोगाशी अतूटपणे जोडले गेलेले आहे.
२) वासना हे दुःखभोगाचे मूळ आहे, विभक्त जीवनाच्या स्वरूपाबद्दलचे अज्ञान हे वासनांचे मूळ आहे.
३) दुःखभोगापासून सुटका करून घेण्याचा, वेदनांचा अंत करण्याचा एक मार्ग आहे.
४) अष्टपदी मार्गाच्या आचरणाने हळूहळू मनाची अज्ञानापासून शुद्धी होत जाते आणि त्यातून ही मुक्ती प्राप्त होते. ह्या चौथ्या सत्याला अष्टपदी मार्गाची पद्धत असे संबोधले जाते.
(अष्टपदी मार्ग उद्याच्या भागात…)
– श्रीमाताजी
(CWM 03 : 248)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…