बहुतेक जण त्यांना जे काही हवे असते त्यालाच सत्य असे नाव देतात. सत्य काही का असेना, ऑरोविलवासीयांनी त्या परमसत्याची आस बाळगावयास हवी. धर्म कोणताही असो, प्राचीन वा अर्वाचीन, नवीन वा भावी, ज्याने अशा सर्व धर्मांचा परित्याग केला आहे व मूलत: जे दिव्य जीवन जगण्याची इच्छा बाळगतात अशा लोकांकरता ऑरोविल आहे.
‘सत्या’चे ज्ञान केवळ अनुभूतीनेच होऊ शकते.
भगवंताची अनुभूती येत नाही तोवर कोणीही भगवंताविषयी बोलू नये. ईश्वराची प्रचिती घ्या; त्यानंतरच तुम्हाला त्याविषयी बोलण्याचा अधिकार असेल.
मानवी जाणिवांच्या विकासाच्या ऐतिहासिक अभ्यासाचा एक भाग म्हणून धर्मांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येईल.
धर्म हे मनुष्यजातीच्या इतिहासाचा एक भाग आहेत; विधिनिषेधात्मक श्रद्धा वा विश्वास ह्या दृष्टीने नव्हे, तर मानवाला एका अधिक श्रेष्ठ अशा साक्षात्काराच्या दिशेने नेणारा मानवी जाणिवेच्या विकासप्रक्रियेतील एक भाग अशा रूपात ऑरोविलमध्ये त्याचा अभ्यास केला जाईल.
*
आमचे संशोधन हे गूढ मार्गांचा प्रभाव असणारा शोध असणार नाही. प्रत्यक्ष ह्या जीवनामध्येच भगवंताचा शोध घेणे ही आमची मनोकामना आहे आणि ह्या शोधाच्या माध्यमातूनच जीवनाचे खरेखुरे रूपांतरण होऊ शकते…
– श्रीमाताजी
(CWM 13 : 206)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…