बहुतेक जण त्यांना जे काही हवे असते त्यालाच सत्य असे नाव देतात. सत्य काही का असेना, ऑरोविलवासीयांनी त्या परमसत्याची आस बाळगावयास हवी. धर्म कोणताही असो, प्राचीन वा अर्वाचीन, नवीन वा भावी, ज्याने अशा सर्व धर्मांचा परित्याग केला आहे व मूलत: जे दिव्य जीवन जगण्याची इच्छा बाळगतात अशा लोकांकरता ऑरोविल आहे.
‘सत्या’चे ज्ञान केवळ अनुभूतीनेच होऊ शकते.
भगवंताची अनुभूती येत नाही तोवर कोणीही भगवंताविषयी बोलू नये. ईश्वराची प्रचिती घ्या; त्यानंतरच तुम्हाला त्याविषयी बोलण्याचा अधिकार असेल.
मानवी जाणिवांच्या विकासाच्या ऐतिहासिक अभ्यासाचा एक भाग म्हणून धर्मांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येईल.
धर्म हे मनुष्यजातीच्या इतिहासाचा एक भाग आहेत; विधिनिषेधात्मक श्रद्धा वा विश्वास ह्या दृष्टीने नव्हे, तर मानवाला एका अधिक श्रेष्ठ अशा साक्षात्काराच्या दिशेने नेणारा मानवी जाणिवेच्या विकासप्रक्रियेतील एक भाग अशा रूपात ऑरोविलमध्ये त्याचा अभ्यास केला जाईल.
*
आमचे संशोधन हे गूढ मार्गांचा प्रभाव असणारा शोध असणार नाही. प्रत्यक्ष ह्या जीवनामध्येच भगवंताचा शोध घेणे ही आमची मनोकामना आहे आणि ह्या शोधाच्या माध्यमातूनच जीवनाचे खरेखुरे रूपांतरण होऊ शकते…
– श्रीमाताजी
(CWM 13 : 206)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…