जे लोक जीवनापासून निवृत्त होतात, आध्यात्मिक जीवनाच्या प्राप्तीसाठी लौकिक जीवनाचा परित्याग करतात त्यांचा मार्ग म्हणजे गूढ साधनेचा मार्ग असे मला म्हणावयाचे आहे. हे लोक लौकिक आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही जीवनांमध्ये फारकत करतात आणि म्हणतात “एक तर हे नाहीतर ते दुसरे.” आम्ही म्हणतो, “यात तथ्य नाही.” जीवनामध्येच आणि पूर्णपणे, समग्रतेने जीवन जगत असतांनाच व्यक्ती आध्यात्मिक जीवन जगू शकते, जगले पाहिजे. परमोच्च चेतनेला येथे भूतलावरच आणायचे आहे.
निखळ जडभौतिक आणि प्राकृतिक दृष्टिकोनातून पाहिले असता, मनुष्य हा काही शेवटची प्रजाती नव्हे. प्राण्यानंतर जसा मानव आला तसाच मानवानंतर दुसरा जीव यायलाच हवा. आणि सर्वत्र एकाच चैतन्याचे (जाणीवशक्तीचे) अस्तित्व असल्यामुळे, तेच चैतन्य वा तीच चेतना मानवत्वाचा अनुभव प्राप्त केल्यानंतर, अतिमानवीय अस्तित्वाचा अनुभव घेईल. आणि म्हणूनच जर आपण दूर कोठेतरी जाऊ, जीवनाला सोडून देऊ, जर जीवनास नकार देऊ तर, आपली त्यासाठी कधीच तयारी होणार नाही.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 330-31)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…