आपण इथे आहोत ते सर्व इच्छा-वासनांना टाकून देत भगवंताकडे वळण्यासाठी आणि ईश्वराविषयी जागरूक होण्यासाठी! ज्या ईश्वराच्या प्राप्तीची आपण इच्छा करतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. तो आपल्या स्वत:च्या सृष्ट विश्वाच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा आहे ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साह्याने ‘त्याला’ जाणण्यास, ‘त्याच्या’शी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्याला’ अभिव्यक्त करण्यास समर्थ बनणे ही होय. ह्याच गोष्टीसाठी आपण स्वत:ला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे खरे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक चैतन्याचे आविष्करण.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 347)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…