…..जगातील कोणत्याही समूहांच्या तुलनेत, ऑरोविलसारख्या एखाद्या नगरीची निर्मिती ही पृथ्वीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे असे जेव्हा मी लोकांना सांगते, तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यादृष्टीने ती अगदी नगण्य अशी भाकडकथा आहे.
मी एकदा श्रीअरविंदांना विचारले, (कारण तेव्हा ऑरोविल ही माझी एक ‘संकल्पना’ होती, संकल्पना नव्हे, तर ती एक गरज होती, जी तीसवर्षांपेक्षा अधिक वर्षांपूर्वी, नव्हे, चाळीस वर्षांपूर्वी व्यक्त झाली होती.) म्हणून मी त्यांना विचारले आणि त्यावर त्यांनी उत्तर दिले, “सर्वसाधारण असा संघर्ष टाळण्याची ही मानवजातीसाठी असलेली सर्वोत्तम संधी आहे.” म्हणून, जेव्हा त्यांनी असे सांगितले तेव्हापासून मी त्यावर मन:पूर्वकतेने काम करीत आले आहे. अर्थात, ते नुसते ‘सांगणे’ नव्हते तर ती ‘अनुभूती’ होती.
…त्याचा पाया…”विविधतेतून एकतेची उभारणी करण्याची कला” हा आहे. एकसारखेपणा नव्हे. तर व्यामिश्रतेमधील सुमेळ यामधून आलेली एकता, प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य स्थानी असणे…..
श्रीअरविंदांना म्हणावयाचे होते, साधारणपणे सर्व घडामोडी अरिष्टाच्या दिशेने जात होत्या आणि म्हणून ऑरोविलची निर्मिती म्हणजे शक्तिप्रवाह योग्य दिशेने वळविण्याची कृती होती.
(The Mother : Conversations with a disciple, Oct 25, 1967)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…