तर अशी अशी कारणे असतात – असंख्य कारणे, अगणित कारणे असतात. आणि या सगळ्या गोष्टी अतिशय असामान्य पद्धतीने एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि आजारपण काय आहे हे जाणून घ्यायचे असेल, तो बरा करावयाचा असेल तर, व्यक्तीला त्या आजाराचे कारण समजले पाहिजे, त्याचे रोगजंतु नव्हे. कारण असे घडते की, जेव्हा रोगजंतु असतात, तेव्हा डॉक्टर्स त्यांना मारण्यासाठी काहीतरी रामबाण उपाय शोधून काढतात, पण त्याने हा आजार बरा होतो आणि दुसराच कोणतातरी अधिक मोठा आजार उद्भवतो! कोणालाच समजत नाही की असे का? …पण कदाचित मला माहीत आहे.
कारण त्या आजाराचे कारण हे निव्वळ शारीरिक नसते, तर दुसरेच काही असते. जे पहिले लक्षण होते, ते कोणत्यातरी दुसऱ्याच अव्यवस्थेचे केवळ बाह्य लक्षण होते. आणि जोवर तुम्ही त्यात हात घालत नाही, ती अव्यवस्था शोधून काढत नाही, तोवर त्या येणाऱ्या आजाराला तुम्ही रोखू शकत नाही. ती अव्यवस्था शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे गहनगाढ असे गूढशास्त्राचे ज्ञान हवे आणि प्रत्येकाच्या आंतरिक कार्याविषयीचे सखोल ज्ञान हवे. तर आपण आत्ता इथे थोडक्यात, आंतरिक कारणांचा धावता आढावा घेतला.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…