ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

असंतुलनाची आंतरिक कारणे :

मी म्हटल्याप्रमाणे कारणे असंख्य असतात, आंतरिक कारणे तर असतातच, म्हणजे जी तुमची व्यक्तिगत असतात अशी कारणे असतातच आणि बाकीची बाह्यवर्ती कारणेही असतात, जी तुमच्यामध्ये बाहेरून येतात. म्हणजे आता दोन मुख्य प्रकार पडले.

आपण म्हणालो तसे, तुमच्यामध्ये मेंदू, फुफ्फुसे, हृदय, पोट, यकृत इ. इ. घटक असतात. जर प्रत्येक जण त्याचे त्याचे कर्तव्य आणि त्याचे कार्य सामान्य पद्धतीने करेल आणि दिलेल्या वेळी सर्व जण एकदिलाने एकत्रितपणे, योग्य प्रकारे चालतील; असे आपण गृहीत धरू की, ते परस्परांशी सुसंवादी आहेत, चांगले मित्र आहेत, त्यांचे एकमेकांशी चांगले जुळते आणि जो तो आपापले काम करत आहे; अगदी प्रत्येक हालचाल योग्य वेळी, इतरांशी संवादी राहत, कोणी खूप लवकरही नाही किंवा उशीराही नाही, कोणी खूप वेगाने किंवा कोणी अगदीच सावकाश, असेही नाही, खरोखर, सारे काही सुरळीत चालू असेल तर, तुम्ही अगदी ठणठणीत असता. (हे लक्षात घ्या की, जर तुम्हाला त्या सगळ्याचा विचार करत बसावे लागले असते तर, ते किती गुंतागुंतीचे झाले असते आणि जर का ते तसे असते तर, ते सर्व काही नेहमीच योग्य प्रकारे झाले असते की नाही, याविषयी मला शंका आहे.)

आता असे समजा की, त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण, या ना त्या कारणाने, वाईट मनःस्थितीत असेल – म्हणजे तो आवश्यक तेवढ्या जोशाने काम करत नाही, एखाद्या नेमक्या क्षणीच तो संपावर जातो. तेव्हा तो एकटाच आजारी पडतो असे समजू नका, तर सगळी व्यवस्थाच कोलमडून पडते आणि मग तुम्हाला अगदीच आजारी असल्याचे वाटायला लागते.

आणि जर का दुर्दैवाने, प्राणिक असंतुलनही असेल, म्हणजे, जसे की तुम्ही निराश असाल किंवा एखादी भावना खूप आक्रमक असेल, किंवा एखादा आवेग खूप तीव्र असेल किंवा तुमच्या प्राणाला बिनसवणारे असे दुसरे काही असेल, तर त्याची त्यामध्ये भरच पडते. आणि त्यात भरीस भर म्हणून, तुमचे विचार सैरभैर झाले असतील आणि तुम्ही नको त्या कल्पना करू लागलात, आणि मनामध्ये भीतीदायक गोष्टी आणि भयानक संकटांची कल्पना करू लागलात, तर मग मात्र तुम्ही नक्कीच पूर्णपणे आजारी पडता…. गोष्टी किती गुंतागुंतीच्या असतात, हे लक्षात आले ? एखादी बारकीशी गोष्ट चुकीच्या पद्धतीने वागू लागली तर, आंतरिक संसर्गाने ती अधिक गंभीर गोष्टींकडे घेऊन जाणारी ठरते. म्हणून गोष्टी तत्काळ नियंत्रणात आणणे किती महत्त्वाचे असते, लक्षात आले ?
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

16 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago