व्यक्तीने जागरूक असणे आवश्यक आहे. तिला स्वतःच्या अवयवांच्या कार्याची जाण हवी, कोणता अवयव नीट काम करत नाहीये, त्याची जाणीव हवी म्हणजे मग त्याने तंदुरुस्त होण्यासाठी, काय करायला हवे ते तुम्ही त्याला ताबडतोब सांगू शकाल. म्हणजे लहान मुलांना जसे समजावून सांगतात तसे, त्यांना समजावून सांगायचे. म्हणजे ते जेव्हा अहितकारक गोष्टींमध्ये गुंतू लागतात (हाच तो क्षण असतो जेव्हा त्यांना सांगितले गेले पाहिजे) तेव्हा तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे की, नाही, या पद्धतीने काम करता कामा नये, तर ते अमुक अशा पद्धतीने केले पाहिजे.
उदाहरणार्थ असे समजा की, तुमचे हृदय वेड्यासारखे धडधडायला लागले तर, तेव्हा तुम्ही त्याला शांत केले पाहिजे. त्याला सांगितले पाहिजे की, असे वागता कामा नये आणि त्याच वेळी (केवळ त्याच्या मदतीसाठी म्हणून) तुम्ही दीर्घ, तालबद्ध, नियमित असा श्वासोच्छ्वास करू लागाल, तर अशा वेळी तुमची फुफ्फुसे ही हृदयाची मार्गदर्शक होतील आणि योग्य रीतीने काम कसे करायचे असते, हे ती हृदयाला शिकवतील. अशी मी हजारो उदाहरणे तुम्हाला देऊ शकते. तर… जीवाच्या विविध भागांमध्ये असंतुलन असते, त्यांच्या कार्यामध्ये विसंवाद असतो, हे मी तुम्हाला आत्ता सांगितले.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…