श्रीअरविंद एकांतवासात असताना, श्रीअरविंदांचे १९२६ ते १९५० या कालावधीमध्ये एकही छायाचित्र काढण्यात आले नाही. आणि नियतीची योजना कशी असते पाहा; १९५० साली म्हणजे ज्यावर्षी श्रीअरविंदांनी देह ठेवला त्यावर्षी श्री. कार्टिअन ब्रेसन हे सुप्रसिद्ध छायाचित्रकार आश्रमात आले होते. आश्रमात आल्यानंतर त्यांनी श्रीमाताजींना श्रीअरविंदांचे छायाचित्र घेण्याविषयी परवानगी मागितली. श्रीमाताजींनी मला बोलावून सांगितले, “मी श्री. ब्रेसन यांना छायाचित्र काढण्याची परवानगी दिली आहे. त्यांना काय लागेल ती मदत कर. त्यांना काय हवंनको ते बघ.”
श्री. ब्रेसन यांनी ‘दर्शना’चे छायाचित्र घेतले. श्रीमाताजींनी त्यांना सांगितले होते की, छायाचित्र घेताना फ्लॅशलाईटचा वापर करावयाचा नाही. बिचारे ब्रेसन! फ्लॅशलाईटशिवाय त्यांना छायाचित्र घेणे भाग पडले. त्या काळात कॅमेऱ्याच्या तितक्या प्रगत लेन्सेस नव्हत्या. ब्रेसन श्रीमाताजींना म्हणाले, “या इतक्या मंद प्रकाशात छायाचित्र घेण्याएवढे आपले तंत्रज्ञान अजून प्रगत झालेले नाही ह्याचे मला खरंच खूप वाईट वाटतेय. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतो.”
‘दर्शना’चे छायाचित्र काढून झाल्यानंतर ‘श्रीअरविंद त्यांच्या खोलीतील नेहमीच्या खुर्चीत बसलेले आहेत’ हे छायाचित्र काढण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. श्रीअरविंद बसलेले आहेत, श्री.ब्रेसन छायाचित्र काढत आहेत, ते श्रीअरविंदांना सांगत आहेत, तुमची मान थोडी अशी करा, थोडे इकडे पाहा, थोडे तिकडे पाहा, इ. इ. आणि ह्या सर्व घटनेचा मी एकटाच साक्षीदार होतो, खूप छान अनुभव होता तो!
छायाचित्र काढून झाल्यानंतर श्री. ब्रेसन मला असे म्हणाले कि, “अजिबात हालचाल न करता किंवा दहा मिनिटांत एकदासुद्धा पापणी न हलवता छायाचित्रासाठी बसून राहिलेले असे मॉडेल मी उभ्या आयुष्यात कधी पाहिले नाही.”
लेखक – श्री. उदार
(One of Mother’s Children : pg.22 – लेखक श्री. उदार)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…