आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे ; मात्र आपले खरे अस्तित्व आपल्या अंतरंगामध्ये असते. हे सर्वोच्च अस्तित्व असते, ते आपले खरे व दिव्य अस्तित्व असते. ते सक्रिय आणि प्रकट व्हावे यासाठी आपण शरीर, प्राण व मन या आपल्या बाह्यवर्ती ‘स्व’च्या अतीत जाणे आवश्यक असते.
अंतरंगामध्ये राहून जीवन जगल्याने आणि अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहण्याने आपल्याला त्या दिव्य अस्तित्वाचा शोध लागू शकतो. एकदा का तो शोध लागला की, तेथे राहून आध्यात्मिक किंवा दिव्य अशा मन, प्राण, शरीर यांची घडण करणे आणि या साधनांद्वारे ज्यामधून दिव्य जीवनासाठी सुयोग्य असे वातावरण निर्माण होऊ शकेल अशा एका जगापर्यंत जाऊन पोहोचणे हे प्रकृतीच्या शक्तीने आपल्यापुढे ठेवलेले अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी पहिली आवश्यकता असते ती म्हणजे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आत्म्याचा शोध घेतला पाहिजे, आपल्या अंतरंगातील दिव्य सद्वस्तुचा शोध घेतला पाहिजे आणि स्वतःच्या सर्व अस्तित्वाद्वारे जीवनामध्ये त्याची अभिव्यक्ती केली पाहिजे.
• श्रीअरविंद (CWSA 21 : 1059-1060)
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…
सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो…
स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव…
पृथ्वीवरील समग्र जीवसृष्टीमध्ये केवळ मानवाला एक आगळीवेगळी क्षमता परमेश्वराने बहाल केली आहे. स्वतःला वेगळे…
एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती…