तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती चेतनेपासून मागे होऊन, अंतरंगात खोलवर शिरले पाहिजे. मग आत… आत… आत… खोलवर, खूप खोल, एका अतिशय खोल, अचल आणि शांत विवरामध्ये प्रवेश केला पाहिजे. तिथे गेल्यावर तुम्हाला अतिशय अचल व परिपूर्ण, माधुर्यपूर्ण असे आणि एक प्रकारच्या ऊबदार, स्थिरशांत तत्त्वामुळे समृद्ध झालेले असे काहीतरी आढळेल. तो अंतरात्मा असतो.
व्यक्ती जर तसाच प्रयत्न करत राहिली आणि सचेत राहिली तर, तिला एक प्रकारची परिपूर्णता अनुभवास येते आणि त्यामध्ये काहीतरी परिपूर्ण, अगाध खोली असल्याची तिला जाणीव होते. व्यक्तीला असे जाणवते की, तिने जर त्यामध्ये प्रवेश केला तर तिच्यासमोर अनेक रहस्यं प्रकट होतील. काहीतरी शाश्वत असावे आणि त्याचे अतिशय शांत, नितळ पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेले असावे तसे हे असते. येथे व्यक्तीला काळाच्या मर्यादेचे बंधन राहात नाही. व्यक्तीने जेव्हा अंतरात्म्याच्या गाभ्याला स्पर्श केलेला असतो तेव्हा, ‘आपण कायमच अस्तित्वात होतो आणि अनंत काळपर्यंत अस्तित्वात राहणार आहोत,’ अशी जाणीव व्यक्तीला होते. आणि हा संपर्क सचेत आणि पुरेसा परिपूर्ण असेल तर, तो तुम्हाला तुमच्या बाह्य रूपाकाराच्या बंधनांतून मुक्त करतो. तुमच्याकडे शरीर आहे म्हणूनच केवळ तुम्ही जिवंत आहात, असे आता तुम्हाला वाटेनासे होते.
(उत्तरार्ध उद्या…)
-श्रीमाताजी (CWM 09 : 310)
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो…
स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव…
पृथ्वीवरील समग्र जीवसृष्टीमध्ये केवळ मानवाला एक आगळीवेगळी क्षमता परमेश्वराने बहाल केली आहे. स्वतःला वेगळे…
एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती…
(व्यक्तीचा जेव्हा तिच्या अंतरात्म्याशी किंवा चैत्य पुरुषाशी संपर्क झालेला असतो, तेव्हाचे ते क्षण महत्त्वाचे असतात…