कोणीतरी मला एका आठ वर्षाच्या मुलीने फ्रेंचमध्ये लिहिलेले पुस्तक आणून दिले.(त्या मुलीचे नाव मिनू डुओट) आठ वर्षाच्या मुलीच्या मानाने ते पुस्तक खरंच खूप विलक्षण आहे. त्या पुस्तकात खूप चांगली चांगली वाक्यं तिने लिहिली आहेत. उदा. चेहऱ्यावर वांग (गोऱ्या रंगावर दिसणारे तपकिरी ठिपके) असलेल्या एका मुलाविषयी ती लिहिते, “तू खूप सुंदर आहेस, तुझ्या चेहऱ्यावरील वांगसुद्धा छान आहेत, जणू काही कोणी देवदूताने तुझ्या चेहऱ्यावर गव्हाचे दाणे पेरले आहेत, ज्यामुळे आकाशातील पक्षी आकर्षित व्हावेत.” खरंच, हे खूप काव्यमय आहे. (श्रीमाताजींनी अशीच उदाहरणे पुढेही दिली.)
ही सारी उदाहरणे पाहून मला मेटरलिंकची (नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक) आठवण येते. ज्या प्रतिभावान साहित्यिकांनी त्यांचे सारे आयुष्यच या साहित्यिक कामासाठी वाहिलेले असते, त्यांच्यामध्ये एक सुव्यवस्थित मानसिक अस्तित्व तयार होते, या अस्तित्वाला स्वत:चे असे जीवन असते; असे साहित्यिक जेव्हा निधन पावतात तेव्हाही हे मानसिक अस्तित्व स्वतंत्रपणे, स्वायत्तपणे शिल्लक राहते; त्याला अभिव्यक्त होण्याची सवय असल्याने ते आविष्कारासाठी इतरत्र माध्यम शोधते.
आणि त्याचवेळी जर असे एखादे मूल असेल की, जे अनुकूल अशा परिस्थितीत जन्माला आले असेल, जसे की येथे त्या मुलीची आई कवयित्री आहे; कदाचित तिची अशी इच्छा असेल की, तिचे मूल असे असामान्य असावे; अशावेळी ते मानसिक अस्तित्व या बाळाच्या जन्माच्यावेळी त्यामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वत:ला अभिव्यक्त करावयाचा प्रयत्न करते. आणि मग अशा वेळी, त्या बालकामध्ये अशी मानसिक परिपक्वता, अशा असामान्य गोष्टी करण्याच्या क्षमता येतात. या मुलीमध्ये मेटरलिंकच्या मानसिक अस्तित्वाचा पुनर्जन्म झाला आहे आणि त्याद्वारे तो अभिव्यक्त होत आहे असे म्हणता येईल.
– श्रीमाताजी (CWM 08:316-318)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…