प्रश्न : व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिची जाणीव ही जागेपणी असलेल्या जाणिवेपेक्षा कशा प्रकारे वेगळी असते?
श्रीमाताजी : ती भिन्न असल्याचे तुमच्या कधी लक्षात आले नाही का? तुमची शारीरिक जाणीव किंवा तुमची सूक्ष्म शारीरिक जाणीव, तुमची प्राणिक जाणीव किंवा तुमच्यामधील कनिष्ठ किंवा उच्चतर प्राणिक जाणीव, तुमची चैत्य जाणीव, तुमची मानसिक जाणीव, ह्या सगळ्या एकमेकींपासून पूर्णत: भिन्न आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा एक जाणीव असते आणि जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा वेगळीच जाणीव असते.
तुम्ही जागे असता तेव्हा गोष्टी तुमच्या बाहेर प्रक्षेपित झालेल्या तुम्ही पाहता, तर निद्रावस्थेत त्याच गोष्टी तुम्ही अंतरंगात पाहता. म्हणजे जागे असताना, तुम्हाला जणू बाहेर धाडण्यात आलेले असते आणि तुम्ही त्याकडे समोरून पाहता आणि निद्रावस्थेत तुम्ही स्वत:कडेच आंतरिक आरशामध्ये पाहता. व्यक्तीने जाणिवांच्या स्थितीमध्ये फरक करावयास शिकले पाहिजे अन्यथा व्यक्ती कायमच गोंधळलेली राहील.
वास्तविक, ही योगमार्गावरील पहिली पायरी आहे, ही धाग्याची सुरुवात आहे. जर व्यक्तीने हा धागा शेवटपर्यंत पकडून ठेवला नाही तर, व्यक्ती वाट चुकण्याची शक्यता असते. तेव्हा तो धागा शेवटपर्यंत पकडून ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
-श्रीमाताजी
(CWM 07 : 131)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…