ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

श्रीमाताजी आणि समीपता – २१

श्रीमाताजी आणि समीपता – २१

साधक : मला नेहमीच असे आढळून आले आहे की, जेव्हा जेव्हा दिव्यत्वाबद्दल एक प्रकारचे आंतरिक प्रेम उफाळून वर येते तेव्हा डोळ्यांमधून अश्रूधारा वाहू लागतात.

श्रीअरविंद : ते भक्तीचे आंतरात्मिक (psychic) अश्रू असतात.

*

साधक : (थोडे दिवसांसाठी आश्रमात वास्तव्यास आलेल्या) एक साधिका आज आश्रमातून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. जेव्हा श्रीमाताजींच्या दर्शनाचा कार्यक्रम संपला आणि श्रीमाताजी जिन्याने वर जाऊ लागल्या, तेव्हा त्या साधिका रडू लागल्या. काही काळासाठी त्यांचे चैत्य अस्तित्व (psychic) अग्रभागी आल्याचा परिणाम म्हणून त्या रडू लागल्या असाव्यात का?

श्रीअरविंद : चैत्य अस्तित्व अग्रभागी येण्याशी अथवा न येण्याशी याचा काही संबंध नाही. त्यांचे चैत्य अस्तित्व जागृत झालेले आहे आणि आंतरिक स्तरावर त्या श्रीमाताजींच्या दीर्घकाळपासून संपर्कात आहेत.

*

साधक : श्रीमाताजींच्या दर्शनाची वेळ आली तेव्हा माझी चेतना निःस्तब्ध आणि रोमांचित झाली होती. तो एक अद्भुत अनुभव होता आणि त्यामुळे माझा चैत्य पुरुष अग्रभागी आला. माझी काया अशा रीतीने रोमांचित का झाली आणि काही काळासाठी माझा देह असा स्तब्ध का झाला?

श्रीअरविंद : अर्थातच, श्रीमाताजींच्या उच्च स्तरावरून होणाऱ्या स्पर्शामुळे तुमची काया रोमांचित झाली होती आणि त्या स्पर्शाचे अस्तित्व अंतरात्मा आणि प्राण या दोघांनाही एकत्रिपणे जाणवले.

*

साधक : चैत्य पुरुष (psychic being) पूर्णतः अग्रभागी येण्याआधी अंतःकरणातील चैत्य अस्तित्वाच्या माध्यमातून श्रीमाताजींशी सचेत संपर्क साधणे शक्य आहे का?

श्रीअरविंद : हो. शक्य आहे. चैत्य अस्तित्व नेहमीच तेथे असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 467-468)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago