श्रीमाताजी आणि समीपता – २०
साधक : सकाळपासून मला असे जाणवते आहे की, मी श्रीमाताजींच्या सन्निध आहे, जणू काही आम्हा दोघांमध्ये काही द्वैतभावच शिल्लक राहिलेला नाहीये. पण हे कसे शक्य आहे? कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये केवढी मोठी दरी आहे? मी मानसिक स्तरावर आहे आणि त्या तर अत्युच्च अतिमानसिक (Supramental) स्तरावर आहेत.
श्रीअरविंद : श्रीमाताजी या फक्त अतिमानसिक स्तरावरच नाहीत तर त्या सर्व स्तरांवर असतात. आणि विशेषतः त्या आंतरात्मिक भागामध्ये (अंतःकरणामध्ये) सर्वांच्या अगदी निकट असतात, आणि म्हणून जेव्हा तो भाग खुला होतो तेव्हा साहजिकपणे ही निकटतेची भावना जागी होते.
*
साधक : मी ज्या ज्या वेळी श्रीमाताजींचे दर्शन घेतो त्या प्रत्येक वेळी मला प्रेम आणि आनंद का जाणवत नाही?
श्रीअरविंद : प्रेम आणि आनंद या गोष्टी अंतरात्म्याच्या (psychic) अग्रभागी येण्यावर अवलंबून असतात.
*
साधक : दोन दिवस माझ्या मनात श्रीमाताजींबद्दल आणि तुमच्याबद्दल अगदी उत्कट प्रेम दाटून आले होते, माझे संपूर्ण अस्तित्व त्या प्रेमाने भारून गेले होते. आणि नंतर मात्र त्याचा परिणाम अंशतःच टिकून राहिला. म्हणजे तुमच्याबद्दल आणि श्रीमाताजींबद्दल उत्कट आणि अपार आदर आणि कोणत्याही ऐहिक सुखाने मिळणार नाही असा आनंद तेवढा शिल्लक राहिला.
श्रीअरविंद : अर्थातच तो आनंद आंतरात्मिक (psychic) होता.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 467-468)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…