साधना, योग आणि रूपांतरण – १७५
उत्तरार्ध
(पूर्वार्धामध्ये आपण योग आणि योगिक चेतना म्हणजे काय, याचा विचार केला.)
नवीन चेतनेच्या (योगिक चेतनेच्या) वाढीबरोबर एक शक्ती साथसंगत करत असते आणि ती त्या चेतनेसोबतच वाढीस लागते आणि चेतनेची वाढ घडून यावी आणि ती पूर्णत्वाला पोहोचावी म्हणून त्या चेतनेला साहाय्य करते. ही शक्ती म्हणजे ‘योगशक्ती’ असते. ही शक्ती आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या सर्व चक्रांमध्ये निद्रिस्त असते आणि ती तळाशी वेटोळे घालून बसलेली असते, या शक्तीस ‘तंत्रशास्त्रा’मध्ये ‘कुंडलिनी’ शक्ती असे म्हणतात.
परंतु ती (योगशक्ती) आपल्या वरच्या बाजूसदेखील असते, आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस ती ‘ईश्वरी शक्ती’ म्हणून स्थित असते – तेथे मात्र ती वेटोळे घालून, अंतर्हित, निद्रिस्त अशी नसते तर ती जागृत, ज्ञानसंपन्न, शक्तिशाली, विस्तृत आणि व्यापक असते. ती तेथे आविष्करणासाठी वाट पाहत असते आणि या ‘ईश्वरी शक्ती’प्रतच म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या शक्तीप्रत आपण स्वतःला खुले केले पाहिजे.
मनामध्ये ती ‘दिव्य मनःशक्ती’ या रूपामध्ये किंवा ‘वैश्विक मनःशक्ती’च्या रूपामध्ये आविष्कृत होते आणि वैयक्तिक मनाला जे करता येणे शक्य नसते असे सारेकाही ती करू शकते; तेव्हा ती ‘योगिक मनःशक्ती’ असते. याचप्रमाणे जेव्हा ती प्राण किंवा शरीर यामध्ये आविष्कृत होते तेव्हा ती ‘योगिक प्राणशक्ती’ किंवा ‘योगिक शारीरिक-शक्ती’ म्हणून प्रकट होते. ती वरील सर्व रूपांमध्ये जागृत होऊ शकते, बहिर्गामी आणि ऊर्ध्वगामी भेदन करत (bursting), ती खालून ऊर्ध्वगामी होताना स्वतःला व्यापक करत करत विस्तृत होऊ शकते किंवा ती अवरोहण (descend) करू शकते आणि वस्तुमात्रांसाठी तेथे एक निश्चित शक्ती बनून राहू शकते; किंवा ती स्वतः अधोमुखी होत, कार्यकारी होत व्यक्तीच्या शरीरामध्ये स्वतःचा वर्षाव करू शकते, तिचे स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करत, ती वरून खाली अशी व्यापकतेमध्ये विस्तृत होऊ शकते, ती आपल्यामधील कनिष्ठतमतेचा आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतमतेशी धागा जोडून देते, व्यक्तीची वैश्विक जगामध्ये किंवा केवलतेमध्ये आणि विश्वतीतामध्ये प्रवेश करून देते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 422)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…