साधना, योग आणि रूपांतरण – १५८
पूर्णयोगांतर्गत भक्ती
भक्तीने व्याकुळ होऊन अश्रुधारा वाहू लागतात त्याविषयी श्रीअरविंद एका पत्रात लिहितात की, आंतरिक अभीप्सेमुळे जेव्हा अश्रू येतात तेव्हा त्या अश्रूंना रोखून धरण्याची काहीही आवश्यकता नाही. परंतु जर ते प्राणिक असतील, वरपांगी असतील, अगदी वरवरचे असतील तर तेव्हा मात्र ते अश्रू म्हणजे भावनिक अव्यवस्थेची आणि क्षोभाची कृती ठरते. प्रार्थनेच्या उत्कटतेला अजिबात नकार देऊ नये; अशाप्रकारची प्रार्थना ही योगसाधनेच्या सर्वात शक्तिशाली माध्यमांपैकी एक असते.
*
फक्त सामान्य प्राणिक भावनांमुळेच (vital emotions) शक्तिव्यय होतो आणि त्यामुळे तुमची एकाग्रता आणि शांती भंग पावते, म्हणून अशा प्राणिक भावनांना प्रोत्साहन देता कामा नये. मुळात भावना ही काही वाईट गोष्ट नाही; भावना म्हणजे प्रकृतीचा एक आवश्यक भाग आहे आणि आंतरात्मिक भावना (psychic emotion) ही तर साधनेला साहाय्यकारी होणाऱ्या गोष्टींमधील एक सर्वात प्रभावशाली गोष्ट आहे. आंतरात्मिक भावनेमुळे ‘ईश्वरा’ बद्दलच्या प्रेमामुळे अश्रू येतात किंवा कधी आनंदाश्रू येतात; असे अश्रू अडवता कामा नयेत. त्यामध्ये प्राणिक भावनांची भेसळ झाली तर मात्र साधनेमध्ये अडथळा निर्माण होतो.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 362), (CWSA 29 : 351)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…