साधना, योग आणि रूपांतरण – १५०
पूर्णयोगांतर्गत भक्ती
(केवळ प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्वरी उपस्थितीची जाणीव, अनुभूती, साक्षात्कार इत्यादी काहीच साध्य होत नाहीये, असे एका साधकाने श्रीअरविंदांना लिहून कळविले आहे. त्यावर त्यांनी दिलेले हे उत्तर…)
…निव्वळ प्रार्थनेद्वारे या गोष्टी लगेचच प्राप्त होतील, असे सहसा घडत नाही. परंतु (तुमच्या अस्तित्वाच्या) गाभ्यामध्ये जर जाज्वल्य श्रद्धा असेल किंवा अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिपूर्ण श्रद्धा असेल तरच तसे घडून येते. परंतु याचा असा अर्थ नाही की, ज्यांची श्रद्धा तितकीशी दृढ नाही, किंवा ज्यांचे समर्पण परिपूर्ण नाही ते तिथवर पोहोचूच शकत नाहीत. परंतु मग सहसा त्यांना सुरुवातीला छोट्या छोट्या पायऱ्या पार कराव्या लागतात; आणि त्यांना त्यांच्या प्रकृतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कालांतराने तपस्येद्वारे आणि प्रयत्नसातत्याद्वारे त्यांना पुरेसे खुलेपण प्राप्त होते. एवढेच नव्हे तर, डळमळणारी श्रद्धा आणि संथ, आंशिक समर्पण यांचीसुद्धा स्वत:ची म्हणून काहीएक शक्ती असते, त्यांचे स्वत:चे असे काही परिणाम असतात. तसे नसते तर, अगदी मोजक्या लोकांनाच साधना करणे शक्य झाले असते. केंद्रवर्ती श्रद्धा म्हणजे ‘आत्म्या’ वर किंवा मागे असलेल्या ‘केंद्रवर्ती अस्तित्वा’वर श्रद्धा असे मला म्हणायचे आहे. ही अशी श्रद्धा असते की, जेव्हा मन शंका घेते, प्राण खचून जातो, आणि शरीर ढासळू पाहते तेव्हासुद्धा ही श्रद्धा टिकून असते. आणि जेव्हा हा आघात संपतो, तेव्हा ती श्रद्धा पुन्हा उसळून येते आणि पुन्हा एकदा मार्गक्रमण करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 95-96)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…