साधना, योग आणि रूपांतरण – १३६
‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमाद्वारे बाह्य जीवनव्यवहारामध्ये कार्य करता यावे यासाठी तुमच्यामध्ये खालील तीन गोष्टी असणे आवश्यक असते.
०१) ‘अविचलता, समता’ – म्हणजे घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त व दृढ ठेवणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टिकोनातून पाहूनसुद्धा स्वतः समचित्त राहणे.
०२) ‘निरतिशय श्रद्धा’ – म्हणजे जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल अशी श्रद्धा बाळगणे, पण त्याचबरोबर, व्यक्ती जर स्वतःला (ईश्वराचे) खरेखुरे साधन बनवू शकली तर, ‘कर्तव्यम् कर्म’ हे त्याचे आपल्याला मिळालेले फळ असेल अशी श्रद्धा त्या व्यक्तीने बाळगणे. ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या त्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म केले पाहिजे असे जाणवते ते कर्म म्हणजे ‘कर्तव्यम् कर्म.’
०३) ‘ग्रहणशीलता’ – ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची आणि त्यामध्ये त्या शक्तीची व श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवण्याची ताकद व्यक्तीमध्ये असणे तसेच, व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला व कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य ‘ईश्वरी शक्ती’ला करू देणे म्हणजे ग्रहणशीलता.
व्यक्तीला जर या ‘शक्ती’ची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबत असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची भेसळ होऊ देता कामा नये.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 266)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…