साधना, योग आणि रूपांतरण – १३५
एखादी कृती योग्य आहे की अयोग्य याविषयी तुम्ही सजग होऊ इच्छित असाल आणि तशी आस बाळगत असाल तर, ती गोष्ट खालील मार्गांपैकी कोणत्या तरी एका मार्गाने घडून येते –
१) तुमच्या हालचालींकडे साक्षित्वाने पाहण्याची एक क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते किंवा तशी सवय तुम्हाला लागते, ज्यामुळे तुम्ही, तुम्हाला कृती करण्यास उद्युक्त करणाऱ्या आवेगाकडे आणि त्याच्या स्वरूपाकडेसुद्धा पाहू शकता.
२) तुमच्यामध्ये एखादा चुकीचा विचार किंवा तुम्हाला कृती करण्यास उद्युक्त करणारा एखादा चुकीचा आवेग किंवा भावना निर्माण झाली की, लगेचच, जिला बेचैनी, अस्वस्थता जाणवते अशा प्रकारची एक चेतना तुमच्यामध्ये उदयास येऊ शकते.
३) जेव्हा तुम्ही एखादी चुकीची कृती करण्यास उद्युक्त होणार असता तेव्हा, तत्क्षणी तुमच्या अंतरंगातील कोणीतरी तुम्हाला सावध करते आणि ती कृती करण्यापासून तुम्हाला परावृत्त करते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 260-261)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…