साधना, योग आणि रूपांतरण – ५४
(आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आजवर ध्यान म्हणजे काय, ध्यान आणि एकाग्रता यांमध्ये काय फरक आहे, हे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे समजावून घेतले. ध्यान कसे करायचे या बाबतीतले अनेक बारकावेदेखील समजावून घेतले. श्रीअरविंद आणि श्रीमाताजींना, साधकांनी ध्यानात येणाऱ्या अडचणींविषयी वेळोवेळी विचारले आहे आणि त्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत, त्या अडचणींचे निराकरण करण्याचे मार्ग सुचविले आहेत, ते आपण आजपासून विचारात घेणार आहोत.)
साधक : कधीकधी मी माझे मन शांत करण्याचा तर कधीकधी समर्पण करण्याचा प्रयत्न करतो, आणि कधी माझा चैत्य पुरुष (psychic being) शोधण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु अशा प्रकारे मी कोणत्याच एका गोष्टीवर माझे अवधान (attention) केंद्रित करू शकत नाही. यांपैकी कोणती गोष्ट मी सर्वप्रथम केली पाहिजे?
श्रीमाताजी : सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि जी गोष्ट ज्यावेळी उत्स्फूर्तपणे करावीशी वाटेल त्यावेळी ती केली पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 14 : 51)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…