साधना, योग आणि रूपांतरण – ५२
आंतरिक आधार शोधण्यासाठी तुम्ही, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत विशाल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; तुम्ही आत, अधिक आत, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अविचल, प्रसन्न शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे.
अस्तित्वाच्या या अतीव अविचलतेमध्ये, साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःख यातनांपासून दूर, विचार व कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांच्या ऊर्मीपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ‘ईश्वराची उपस्थिती’ अनुभवण्यासाठी तुम्ही अगदी काळजीपूर्वक अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.
तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते. जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ‘ईश्वरी शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अंतर्मुख करणे आवश्यक असते.
जिथे कोणतीही कृती शिल्लक नसते, कोणताही प्रभाव शिल्लक नसतो, अहंकार नसतो, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नसते, अन्य काहीही नसते तर फक्त आनंदलहरी असतात, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत तुम्ही खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ऐक्य अनुभवले पाहिजे…
– श्रीमाताजी (The Supreme : Dialogue with The Mother by Mona Sarkar)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…