ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – २४

साधक : मी प्रार्थना आणि ध्यान करायला अगदी तळमळीने सुरुवात करतो; सुरुवातीला माझी आस उत्कट असते; माझी प्रार्थना भावपूर्ण असते आणि नंतर, काही काळानंतर मात्र ती आस यांत्रिक बनते आणि प्रार्थना नुसती शाब्दिक होते; अशा वेळी मी काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : हे काही तुमच्याच बाबतीत घडते असे नाही; हे अगदी स्वाभाविक आहे. मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे, पण आता ओघात आलेच आहे तर, परत एकदा सांगते, जे लोक असा दावा करतात की, ते दररोज काही तास ध्यान करतात आणि त्यांचा सर्व दिवस ते प्रार्थनेमध्ये व्यतीत करतात, माझ्या मते, त्यांचा त्यातील तीन-चतुर्थांश वेळ हा पूर्णत: यांत्रिकपणे जात असणार म्हणजे त्यावेळी त्यामधील सर्व मन:पूर्वकता गमावलेली असते…

…एकाग्रता आणि ध्यान करण्यासाठी, ज्याला मी एकाग्रतेसाठी ‘मानसिक स्नायुंची घडण’ असे म्हणते तो व्यायाम तुम्ही केला पाहिजे. ज्याप्रमाणे व्यक्ती वजन उचलण्यासाठी स्नायुंचे व्यायाम करते तसेच प्रयत्न तुम्ही एकाग्रतेसाठी केले पाहिजेत. एकाग्रता अगदी मन:पूर्वक व्हावी, ती कृत्रिम असू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही त्यासाठी खरोखरीचा प्रयत्न केला पाहिजे.

…हे उघडच आहे की, ज्याला एकाग्रता करण्याची अजिबात सवय नाही, त्याच्यापेक्षा ज्या व्यक्तीला त्याची सवय आहे ती व्यक्ती जास्त काळ एकाग्रता साधू शकेल.

…ध्यानाच्या कालावधीला तितकेसे काही महत्त्व नाही; त्याच्या कालावधीवरून तुम्ही ध्यानाला किती रुळलेला आहात एवढेच काय ते लक्षात येते. अर्थातच, हा कालावधी खूप वाढवता देखील येऊ शकतो पण त्यालाही काही मर्यादा असते आणि व्यक्ती जेव्हा त्या मर्यादेपर्यंत जाऊन पोहोचते तेव्हा तिने थांबले पाहिजे, इतकेच. ती अप्रामाणिकता नसते तर, ती अक्षमता असते.

…(मात्र जेव्हा) तुम्ही ध्यान करत नसता पण ध्यान करत आहात असे भासवता तेव्हा, ती अप्रामाणिकता ठरते. तेव्हा मग ते ध्यान असत नाही, तर तो केवळ एक उपचार असतो.

– श्रीमाताजी (CWM 08 : 227-228)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

10 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago