ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – १७ (भाग ०१)

(श्रीअरविंद आश्रमामध्ये श्रीमाताजी साधकांसमवेत ध्यानाला बसत असत. त्यांचा हा उपक्रम अनेक वर्षे चालू होता. तेथे आणि इतरत्र जो अनुभव त्यांनी घेतलेला होता, त्या अनुभवाच्या आधारे श्रीमाताजी येथे काही निरीक्षणे नोंदवत आहेत. श्रीमाताजींची ही निरीक्षणे पाच भागांमध्ये देत आहोत.)

साधक : “असे काही जण असतात की, जे ध्यानाला बसले असता, त्यांना जी स्थिती अतिशय उत्तम आणि आनंदी वाटते अशा एका स्थितीमध्ये जातात,” असे तुम्ही मागे एकदा सांगितले होते. ही स्थिती नेमकी कशी असते?

श्रीमाताजी : ती स्थिती कोणती का असेना, त्यांची ती स्थिती त्यांना आनंदमय आणि विलक्षण वाटते. आपण कोणीतरी विशेष आहोत असे त्यांचे स्वतःविषयी मत असते. ते स्वतःला असामान्य समजत असतात कारण ते अजिबात हालचाल न करता, शांतपणे एका जागी स्थिर बसू शकतात आणि त्यातून जर एकही विचार त्यांच्या मनात आला नाही तर, मग ते त्यांना फारच विलक्षण वाटते. परंतु सहसा त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकारच्या शोभादर्शक यंत्रासारखी (kaleidoscope) स्थिती असते (त्यांच्या डोक्यात अगदी क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार येत राहतात), पण त्यांना त्याची जाणीवदेखील नसते. असो. तर जे क्षणभरासाठी अगदी अविचल, काहीही न बोलता, विचार न करता राहू शकतात, त्यांचे स्वतःविषयीचे मत निश्चितपणे खूप चांगले असते.

फक्त एवढेच की, मी म्हटले त्याप्रमाणे, जर त्यांना त्या ध्यानावस्थेतून कोणी बाहेर काढले, — कोणीतरी आले आणि त्यांनी दारावर थाप दिली आणि म्हटले की, “अमुक एक जण तुमची वाट पाहत आहे,” किंवा “अहो ताई, तुमचे बाळ रडत आहे,” तर मग ते ताबडतोब संतप्त होतात आणि म्हणतात, “काय हे! तुम्ही माझे ध्यान बिघडवलेत, पूर्णपणे बिघडवलेत.” अशा ज्या गोष्टी मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगत आहे. हे लोक त्यांच्या ध्यानाबाबत अतिशय काटेकोर असायचे आणि त्यांच्या ध्यानामध्ये कोणी अडथळा आणला की ते प्रचंड क्रोधित व्हायचे. …अर्थातच हे काही महान आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण नाही. मग ते आल्यागेल्या प्रत्येकावरच चिडचिड करत राहायचे कारण कोणीतरी त्यांना त्यांच्या अतिशय आनंदमय अशा ध्यानमग्न स्थितीमधून बाहेर काढलेले असायचे. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 41)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago