आध्यात्मिकता २६
जीवनाचा त्याग करणे ही खरी आध्यात्मिकता नव्हे, तर ‘ईश्वरी पूर्णत्वा’च्या साहाय्याने जीवन परिपूर्ण बनविणे ही खरी आध्यात्मिकता असते. भारताने आता जगाला ही खरी आध्यात्मिकताच दाखविली पाहिजे.
*
आध्यात्मिकतेच्या दृष्टीने पहिले असता भारत हा जगातील अग्रगण्य देश आहे. आध्यात्मिकतेचे आदर्श उदाहरण घालून देणे हे त्याचे जीवितकार्य आहे. आणि जगाला ही शिकवण देण्यासाठी श्रीअरविंदांनी या भूतलावर देह धारण केला.
*
खरी आध्यात्मिकता जीवनाचे रूपांतर घडविते.
*
मनुष्यामध्ये अभीप्सेच्या बिजाला जर खऱ्या आध्यात्मिकतेचे खतपाणी दिले तर तो ‘दिव्यत्वा’मध्ये विकसित होईल.
*
आध्यात्मिकता म्हणजे परम साधेपणा. खरी आध्यात्मिकता ही अतिशय साधी सरळ असते.
*
कर्मामध्ये ‘पूर्णत्वा’साठी असलेली ओढ ही खरी आध्यात्मिकता असते.
*
तुम्ही आध्यात्मिकतेच्या त्या स्तराशी संबंधित आहात ज्या स्तरावर जडभौतिकाला नकार देण्याची आवश्यकता असते आणि जी आध्यात्मिकता जडभौतिकापासून सुटका करून घेऊ इच्छित असते. परंतु ‘उद्याची आध्यात्मिकता’ ही जडभौतिकाला हाती घेईल आणि तिचे रूपांतर घडवून आणेल.
– श्रीमाताजी [CWM 13 : 357, 13 : 244, 14 : 32, 14 : 75, 14 : 151, 14 : 306, 15 : 85]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…