आध्यात्मिकता १७
…तुम्ही जेव्हा ‘ईश्वरा’कडे येता तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व मानसिक संकल्पना टाकून दिल्या पाहिजेत; परंतु तसे करण्याऐवजी, उलट, तुम्ही तुमच्या संकल्पना ‘ईश्वरा’वर लादू पाहता आणि ‘ईश्वरा’ने त्याप्रमाणे वागावे असे तुम्हाला वाटते. ‘योगी’ व्यक्तीचा खरा दृष्टिकोन एकच असतो आणि तो म्हणजे, अशा व्यक्तीने घडणसुलभ (plastic) असले पाहिजे आणि जी काही ‘ईश्वरी आज्ञा’ असेल, तिचे पालन करण्यास सज्ज असले पाहिजे; त्याला कोणतीच गोष्ट अत्यावश्यक वाटता कामा नये, तसेच त्याला कोणत्या गोष्टीचे ओझेही वाटता कामा नये.
ज्यांना ‘आध्यात्मिक जीवन’ जगायची इच्छा असते बहुधा त्यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांच्यापाशी जे जे काही आहे त्याचा त्याग करायचा हीच असते; परंतु, ‘ईश्वरार्पणा’च्या इच्छेने नव्हे तर, त्यांना ओझ्यापासून सुटका हवी असते, म्हणून ते तसे करतात. ज्या लोकांपाशी संपत्ती असते आणि ज्या गोष्टींमुळे त्यांना ऐशोआराम मिळतो, आनंद मिळतो अशा गोष्टी ज्यांच्या सभोवार असतात अशा व्यक्ती जेव्हा ‘ईश्वरा’कडे वळतात तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टींपासून दूर पळण्याची असते, किंवा, ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांना, ”या गोष्टींच्या बंधनातून सुटका करून घ्यायची असते.” पण ही गोष्ट चुकीची आहे.
ज्या गोष्टी तुमच्या असतात, त्या ‘तुमच्या’ आहेत असे तुम्ही मानता कामा नये, कारण त्या ‘ईश्वरा’च्या असतात. तुम्ही त्यांचा उपभोग घ्यावा असे ‘ईश्वरा’ला वाटत असेल तर, त्यांचा उपयोग तुम्ही करावा; परंतु दुसऱ्याच क्षणी हसतमुखाने त्यांचा त्याग करण्यासाठीही तुम्ही सज्ज असले पाहिजे.
– श्रीमाताजी [CWM 03 : 54-55]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…