प्रामाणिकपणा – ३९
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी, भयविरहित शौर्य असणे आवश्यकच आहे. तुम्ही क्षुद्र, क्षुल्लक, दुर्बल आणि कुरूप स्पंदनामुळे म्हणजेच भीतीमुळे या मार्गाकडे कधीही पाठ फिरविता कामा नये.
तुमच्या ठायी दुर्दम्य धैर्य, परिपूर्ण प्रामाणिकपणा असला पाहिजे, तुमचे संपूर्ण आत्मदान अशा कोटीचे असावे की, त्याची कोणतीही गणना किंवा तुलना होता कामा नये. तुम्ही दिलेले दान हे त्या मोबदल्यात काहीतरी मिळावे या अपेक्षेने केलेले असता कामा नये. तुम्ही स्वत:चे जे अर्पण करता ते तुमचे संरक्षण व्हावे या हेतूने केलेले असता कामा नये. तुमच्या श्रद्धेला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता भासता कामा नये. मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर या गोष्टी अपरिहार्य (indispensable) असतात – या गोष्टीच तुमचे सर्व संकटापासून रक्षण करतात.
– श्रीमाताजी [CWM 15 : 190]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…