प्रामाणिकपणा – ३९
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी, भयविरहित शौर्य असणे आवश्यकच आहे. तुम्ही क्षुद्र, क्षुल्लक, दुर्बल आणि कुरूप स्पंदनामुळे म्हणजेच भीतीमुळे या मार्गाकडे कधीही पाठ फिरविता कामा नये.
तुमच्या ठायी दुर्दम्य धैर्य, परिपूर्ण प्रामाणिकपणा असला पाहिजे, तुमचे संपूर्ण आत्मदान अशा कोटीचे असावे की, त्याची कोणतीही गणना किंवा तुलना होता कामा नये. तुम्ही दिलेले दान हे त्या मोबदल्यात काहीतरी मिळावे या अपेक्षेने केलेले असता कामा नये. तुम्ही स्वत:चे जे अर्पण करता ते तुमचे संरक्षण व्हावे या हेतूने केलेले असता कामा नये. तुमच्या श्रद्धेला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता भासता कामा नये. मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर या गोष्टी अपरिहार्य (indispensable) असतात – या गोष्टीच तुमचे सर्व संकटापासून रक्षण करतात.
– श्रीमाताजी [CWM 15 : 190]
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…