कर्म आराधना – ४१
ईश्वरी आज्ञेचे अनुसरण करण्यास जर तुम्ही तयार असाल तर, तुम्हाला देण्यात आलेले कोणतेही कर्म, मग ते कर्म कितीही विलक्षण असले तरी, ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे, आणि ज्या शांतचित्ताने तुम्ही ते कर्म स्वीकारले होते त्याच शांतचित्ताने तुम्हाला अगदी दुसऱ्याच दिवशी ते सोडूनही देता आले पाहिजे. (ते कार्य) ही फक्त तुमचीच जबाबदारी आहे, असे तुम्हाला वाटता कामा नये.
कोणत्याच गोष्टीविषयी वा जीवनशैलीविषयी, कोणतीही ‘आसक्ती’ असता कामा नये. तुम्ही पूर्णपणे मुक्त असले पाहिजे. तुम्हाला खराखुरा योगिक दृष्टिकोन हवा असेल तर, ‘ईश्वरा’कडून येणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार तुम्हाला करता आला पाहिजे आणि तेवढ्याच सहजतेने आणि कोणत्याही पश्चात्तापाविना त्या गोष्टी सोडूनही देता आल्या पाहिजेत. ”मला काहीही नको,” असे म्हणणाऱ्या एखाद्या संन्याशाचा दृष्टिकोन आणि ”मला अमुक एक गोष्ट हवी आहे,’ असे म्हणणाऱ्या प्रापंचिक माणसाचा दृष्टिकोन, हे दोन्ही दृष्टिकोन एकसारखेच असतात. प्रापंचिक जीवन जगणारा माणूस जेवढा त्याच्या मालकीच्या गोष्टींबाबत आसक्त असतो, तेवढाच एखादा संन्यासीसुद्धा त्याच्या परित्यागाविषयी आसक्त असू शकतो.
– श्रीमाताजी
[CWM 03 : 09]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…