कर्म आराधना – ४१
ईश्वरी आज्ञेचे अनुसरण करण्यास जर तुम्ही तयार असाल तर, तुम्हाला देण्यात आलेले कोणतेही कर्म, मग ते कर्म कितीही विलक्षण असले तरी, ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे, आणि ज्या शांतचित्ताने तुम्ही ते कर्म स्वीकारले होते त्याच शांतचित्ताने तुम्हाला अगदी दुसऱ्याच दिवशी ते सोडूनही देता आले पाहिजे. (ते कार्य) ही फक्त तुमचीच जबाबदारी आहे, असे तुम्हाला वाटता कामा नये.
कोणत्याच गोष्टीविषयी वा जीवनशैलीविषयी, कोणतीही ‘आसक्ती’ असता कामा नये. तुम्ही पूर्णपणे मुक्त असले पाहिजे. तुम्हाला खराखुरा योगिक दृष्टिकोन हवा असेल तर, ‘ईश्वरा’कडून येणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार तुम्हाला करता आला पाहिजे आणि तेवढ्याच सहजतेने आणि कोणत्याही पश्चात्तापाविना त्या गोष्टी सोडूनही देता आल्या पाहिजेत. ”मला काहीही नको,” असे म्हणणाऱ्या एखाद्या संन्याशाचा दृष्टिकोन आणि ”मला अमुक एक गोष्ट हवी आहे,’ असे म्हणणाऱ्या प्रापंचिक माणसाचा दृष्टिकोन, हे दोन्ही दृष्टिकोन एकसारखेच असतात. प्रापंचिक जीवन जगणारा माणूस जेवढा त्याच्या मालकीच्या गोष्टींबाबत आसक्त असतो, तेवढाच एखादा संन्यासीसुद्धा त्याच्या परित्यागाविषयी आसक्त असू शकतो.
– श्रीमाताजी
[CWM 03 : 09]
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…