कर्म आराधना – २१
कर्म ज्या वृत्तीने केले जाते ती वृत्ती महत्त्वाची असते. ते कर्म गीतेमध्ये सांगितलेल्या वृत्तीने म्हणजे इच्छाविरहितपणे, निर्लिप्तपणे, कोणत्याही तिटकाऱ्याविना पण शक्य तितके अचूकपणे केले पाहिजे. ते कुटुंबीयांसाठी, पदोन्नतीसाठी किंवा वरिष्ठांची खुशामत करण्यासाठी करता कामा नये तर, ते तुमच्यावर सोपविण्यात आले आहे यासाठीच केले पाहिजे. आंतरिक प्रशिक्षणाचे क्षेत्र म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, यापेक्षा अधिक काही नाही. व्यक्तीने त्यातून समता, इच्छाविरहितता आणि निष्ठा या तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. कर्म ही कर्मासाठी करायची गोष्ट नसते तर, व्यक्तीने स्वतःची कर्मपरता आणि स्वतःची कर्मपद्धती ईश्वराला अर्पण करायची असते. अशा वृत्तीने कर्म केले तर, ते कर्म कोणते आहे यामुळे फारसा फरक पडत नाही. व्यक्तीने स्वतःला अशा प्रकारे आध्यात्मिक रीतीने घडविले तर, तिला एखाद्या दिवशी थेट ईश्वरासाठीचे काम जर सोपविण्यात आले (जसे आश्रमाचे काम) तर, ते योग्य रीतीने करण्यासाठी ती व्यक्ती सज्ज असेल.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 240-241)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…