कर्म आराधना – २१
कर्म ज्या वृत्तीने केले जाते ती वृत्ती महत्त्वाची असते. ते कर्म गीतेमध्ये सांगितलेल्या वृत्तीने म्हणजे इच्छाविरहितपणे, निर्लिप्तपणे, कोणत्याही तिटकाऱ्याविना पण शक्य तितके अचूकपणे केले पाहिजे. ते कुटुंबीयांसाठी, पदोन्नतीसाठी किंवा वरिष्ठांची खुशामत करण्यासाठी करता कामा नये तर, ते तुमच्यावर सोपविण्यात आले आहे यासाठीच केले पाहिजे. आंतरिक प्रशिक्षणाचे क्षेत्र म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, यापेक्षा अधिक काही नाही. व्यक्तीने त्यातून समता, इच्छाविरहितता आणि निष्ठा या तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. कर्म ही कर्मासाठी करायची गोष्ट नसते तर, व्यक्तीने स्वतःची कर्मपरता आणि स्वतःची कर्मपद्धती ईश्वराला अर्पण करायची असते. अशा वृत्तीने कर्म केले तर, ते कर्म कोणते आहे यामुळे फारसा फरक पडत नाही. व्यक्तीने स्वतःला अशा प्रकारे आध्यात्मिक रीतीने घडविले तर, तिला एखाद्या दिवशी थेट ईश्वरासाठीचे काम जर सोपविण्यात आले (जसे आश्रमाचे काम) तर, ते योग्य रीतीने करण्यासाठी ती व्यक्ती सज्ज असेल.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 240-241)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…