‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
श्रीअरविंदांनी डिसेंबर १९३८ मध्ये परत एकदा सांगितले की, ”साधना जेव्हा जडभौतिकामध्ये (physical) आणि अवचेतनेमध्ये (subconscient) खाली उतरली तेव्हा गोष्टी खूपच अवघड झाल्या. मला स्वतःला त्यासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागला कारण अवचेतन हे अतिशय जड असते, ते एखाद्या दगडासारखे जड असते. माझे मन ऊर्ध्वदिशेने जागृत असूनसुद्धा ते स्वतःचा कोणताही प्रभाव निम्नस्तरावर टाकू शकले नाही. हे भगीरथ परिश्रम होते, कारण जेव्हा व्यक्ती तेथे प्रवेश करते तेव्हा जणू काही अस्पर्शित प्रदेशामध्ये प्रवेश केल्यासारखे ते असते. पूर्वीचे योगी हे प्राणशक्तीपर्यंत खाली आलेले होते… पण मी माझे कार्य जर तेथेच सोडून दिले असते तर माझे खरे कार्य अपुरेच राहिले असते. जडभौतिकावर एकदा का विजय प्राप्त झाला की, माझ्यानंतर माझ्या मागून जे लोक या मार्गावर वाटचाल करतील त्यांच्यासाठी या गोष्टी सुकर होतील, यालाच ‘सर्वांमध्ये त्या एकमेवाद्वितीयाचा साक्षात्कार’ असे म्हणता येईल.” (क्रमश:)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…