ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

महायोगी श्रीअरविंद – ०३

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीमाताजी सांगत आहेत की, “बाह्य कामकाजाची सर्व जबाबदारी श्रीअरविंदांनी आता माझ्यावर सोपविली होती कारण अतिमानसिक चेतनेचे आविष्करण त्वरेने व्हावे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून ते सर्व बाह्य कामकाजापासून दूर जाऊ इच्छित होते. आणि त्यांनी काही मोजक्या लोकांपाशी असे जाहीररित्या सांगितलेही होते की, त्या सर्वांना साहाय्य करण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी माझ्यावर सोपविलेले आहे. मी श्रीअरविंदांच्या संपर्कात राहीन आणि अर्थातच ते माझ्या माध्यमातून कार्य करतील, असेही त्यांनी सांगितले होते.

अचानकपणे, गोष्टींना एक विशिष्ट आकार येऊ लागला : एका असाधारण बारकाव्यानिशी एक अतिशय प्रतिभाशाली अशी निर्मिती झाली होती, अतिशय अदभुत असे अनुभव येत होते, दिव्य जिवांसोबत संपर्क प्रस्थापित होत होते, आणि ज्याला चमत्कार मानले जाते अशा सर्व प्रकारचे आविष्कार घडून येत होते. एका पाठोपाठ एक ‘अनुभव’ येत होते आणि गोष्टी अगदी झगमगीतपणे उलगडत चाललेल्या होत्या… अतिशय अदभुत रीतीने त्या घडत होत्या, असे मी नक्की म्हणू शकते.

एके दिवशी मी नेहमीप्रमाणे श्रीअरविंदांना घडलेल्या गोष्टी सांगायला गेले, आम्ही एका खरोखरच स्वारस्यपूर्ण गोष्टीपाशी येऊन पोहोचलो होतो आणि काय घडले ते सांगत असताना मला वाटते मी, काहीसा अधिकच उत्साह दाखविला असावा… श्रीअरविंदांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाले, “हो, ही ‘अधिमानसिक’ सृष्टी आहे. खरोखरच ती अतिशय स्वारस्यपूर्ण गोष्ट आहे, छान झाले. ज्यामुळे तुम्ही जगप्रसिद्ध व्हाल असे चमत्कार तुम्ही घडवून आणू शकाल, तुम्ही खरोखरच या पृथ्वीवरील घटनांमध्ये उलथापालथ घडवून आणू शकाल…”

ते हसून म्हणाले, “ते एक महान यश असेल. परंतु ही ‘अधिमानसिक’ सृष्टी आहे. आणि आपल्याला अपेक्षित असलेले यश हे नव्हे, आपल्याला या पृथ्वीवर ‘अतिमानसा’ची (supramental) स्थापना करायची आहे. एका नवीन जगताच्या निर्मितीसाठी, अतिमानसिक जगताच्या अखंड निर्मितीसाठी, हाती आलेल्या तात्कालिक यशाचा कसा परित्याग करायचा, हे व्यक्तीला माहित असले पाहिजे.”

श्रीअरविंद काय म्हणू पाहत आहेत हे मला माझ्या आंतरिक चेतनेनिशी लगेचच लक्षात आले… काही तासांमध्ये ती (अधिमानसिक) सृष्टी नाहीशी झाली होती आणि त्या क्षणापासून आम्ही पुन्हा अन्य गोष्टींच्या आधारे नव्याने कार्याला सुरुवात केली. (क्रमश:)

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

11 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago