ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

महायोगी श्रीअरविंद – ०३

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीमाताजी सांगत आहेत की, “बाह्य कामकाजाची सर्व जबाबदारी श्रीअरविंदांनी आता माझ्यावर सोपविली होती कारण अतिमानसिक चेतनेचे आविष्करण त्वरेने व्हावे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून ते सर्व बाह्य कामकाजापासून दूर जाऊ इच्छित होते. आणि त्यांनी काही मोजक्या लोकांपाशी असे जाहीररित्या सांगितलेही होते की, त्या सर्वांना साहाय्य करण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी माझ्यावर सोपविलेले आहे. मी श्रीअरविंदांच्या संपर्कात राहीन आणि अर्थातच ते माझ्या माध्यमातून कार्य करतील, असेही त्यांनी सांगितले होते.

अचानकपणे, गोष्टींना एक विशिष्ट आकार येऊ लागला : एका असाधारण बारकाव्यानिशी एक अतिशय प्रतिभाशाली अशी निर्मिती झाली होती, अतिशय अदभुत असे अनुभव येत होते, दिव्य जिवांसोबत संपर्क प्रस्थापित होत होते, आणि ज्याला चमत्कार मानले जाते अशा सर्व प्रकारचे आविष्कार घडून येत होते. एका पाठोपाठ एक ‘अनुभव’ येत होते आणि गोष्टी अगदी झगमगीतपणे उलगडत चाललेल्या होत्या… अतिशय अदभुत रीतीने त्या घडत होत्या, असे मी नक्की म्हणू शकते.

एके दिवशी मी नेहमीप्रमाणे श्रीअरविंदांना घडलेल्या गोष्टी सांगायला गेले, आम्ही एका खरोखरच स्वारस्यपूर्ण गोष्टीपाशी येऊन पोहोचलो होतो आणि काय घडले ते सांगत असताना मला वाटते मी, काहीसा अधिकच उत्साह दाखविला असावा… श्रीअरविंदांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाले, “हो, ही ‘अधिमानसिक’ सृष्टी आहे. खरोखरच ती अतिशय स्वारस्यपूर्ण गोष्ट आहे, छान झाले. ज्यामुळे तुम्ही जगप्रसिद्ध व्हाल असे चमत्कार तुम्ही घडवून आणू शकाल, तुम्ही खरोखरच या पृथ्वीवरील घटनांमध्ये उलथापालथ घडवून आणू शकाल…”

ते हसून म्हणाले, “ते एक महान यश असेल. परंतु ही ‘अधिमानसिक’ सृष्टी आहे. आणि आपल्याला अपेक्षित असलेले यश हे नव्हे, आपल्याला या पृथ्वीवर ‘अतिमानसा’ची (supramental) स्थापना करायची आहे. एका नवीन जगताच्या निर्मितीसाठी, अतिमानसिक जगताच्या अखंड निर्मितीसाठी, हाती आलेल्या तात्कालिक यशाचा कसा परित्याग करायचा, हे व्यक्तीला माहित असले पाहिजे.”

श्रीअरविंद काय म्हणू पाहत आहेत हे मला माझ्या आंतरिक चेतनेनिशी लगेचच लक्षात आले… काही तासांमध्ये ती (अधिमानसिक) सृष्टी नाहीशी झाली होती आणि त्या क्षणापासून आम्ही पुन्हा अन्य गोष्टींच्या आधारे नव्याने कार्याला सुरुवात केली. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

10 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

18 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago