‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
(चंद्रनगरला केलेल्या प्रस्थानाची अरविंद घोष यांनी स्वत: सांगितलेली हकिकत…)
पोलिस खात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मला अशी माहिती मिळाली की, दुसऱ्या दिवशी माझ्या कार्यालयावर छापा घातला जाणार आहे आणि मला अटक करण्यात येणार आहे; ही माहिती मिळाली तेव्हा मी ‘कर्मयोगिन’च्या कार्यालयात होतो. (नंतर खरोखरच कार्यालयावर छापा घालण्यात आला पण माझ्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले नव्हते; तत्पूर्वीच पाँडिचेरीला जाण्यासाठी मी चंद्रनगर सोडले होते.) ही घटना घडण्यापूर्वी, मी माझ्या आजूबाजूला यासंबंधी काही तावातावाने चर्चा, शेरेबाजी चाललेली ऐकत होतो तेव्हाच आकस्मिकपणे मला वरून एक आदेश आला; तो आवाज माझ्या परिचयाचा होता, तीन शब्दांमध्ये तो आदेश देण्यात आला होता, “चंद्रनगरला जा.” अवघ्या दहापंधरा मिनिटांमध्ये चंद्रनगरला जाणाऱ्या बोटीत मी बसलो होतो. बागबजार किंवा इतरत्र कुठेही न जाता, मी तडक माझा नातेवाईक बिरेन घोष आणि मणी (सुरेशचंद्र चक्रवर्ती) यांच्यासमवेत चंद्रनगरला जाण्यासाठी बोटीवर चढलो, रामचंद्र मुजुमदार यांनी घाटाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि तेथूनच त्यांनी आम्हाला निरोप दिला.
आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा अजून अंधारच होता; ते लगेचच सकाळी कलकत्त्याला परतले. मी तेथे गुप्तपणे माझ्या साधनेमध्ये निमग्न राहिलो आणि दोन वृत्तपत्रांबरोबर (कर्मयोगिन् आणि धर्म ही दोन साप्ताहिके) असलेला माझा सक्रिय संपर्क त्या क्षणापासून संपुष्टात आला.
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…