‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष – ०१
अरविंद घोष यांचा जन्म दि. १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रचंड क्षमता असलेले अरविंद घोष यांचे वडील श्री. कृष्णधन घोष हे, शिक्षणासाठी सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये जाणाऱ्या काही लोकांपैकी एक होते. श्री. कृष्णधन घोष भारतात परतले तेव्हा सवयी, कल्पना आणि आदर्श यांबाबत ते पूर्णपणे इंग्रजाळलेले होते. त्यांच्यावर इंग्रजांचा एवढा प्रभाव पडला होता की, आपल्या मुलांना पूर्णपणे युरोपियन पद्धतीनेच वाढवायचे हा जणू श्री. कृष्णधन घोष यांनी पणच केला होता.
घोष कुटुंबीय भारतात रहात होते तेव्हा अरविंदांना दार्जिलिंगमधील आयरीश ननच्या शाळेत शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. १८७९ साली श्री. कृष्णधन घोष यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना इंग्लंडला नेले आणि तेथे एका इंग्लिश धर्मोपदेशकाकडे व त्याच्या पत्नीकडे त्यांना सोपविले. त्या तिघांवर कोणतेही भारतीय संस्कार होऊ नयेत वा त्यांचा भारतीयांशी कोणताही परिचय होऊ नये अशी खबरदारी त्यांनी घ्यावी अशा सक्त सूचना त्या पती-पत्नीला देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. त्यामुळे अरविंद लहान असताना भारत, भारतातील लोक, भारतीयांचा धर्म, भारतीयांची संस्कृती या साऱ्यांविषयी पूर्णपणे अनभिज्ञच राहिले होते. (क्रमश: …)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…