विचार शलाका – २३
(आम्हाला आश्रमामध्ये येऊनच योगसाधना करायची आहे, असे म्हणणाऱ्या लोकांना श्रीअरविंद सांगत आहेत…)
एखादी व्यक्ती जर दूर अंतरावर राहून साहाय्य प्राप्त करून घेऊ शकली नाही तर ती व्यक्ती येथे (आश्रमात) योगसाधना करण्याची अपेक्षा कशी बाळगू शकते? (पूर्णयोग) ही अशी योगपद्धती आहे की जी तोंडी सूचना किंवा इतर कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. तर स्वत:ला खुले (open) करण्याचे सामर्थ्य आणि अगदी संपूर्ण नि:स्तब्धतेमध्ये देखील ‘ती’ शक्ती व तिचा प्रभाव ग्रहण करण्याचे सामर्थ्य या गोष्टींवर ही योगपद्धती अवलंबलेली आहे. त्या शक्तीला जे दूर अंतरावरून ग्रहण करू शकत नाहीत ते इथेसुद्धा (आश्रमात) ती शक्ती ग्रहण करू शकणार नाहीत. स्वत:मध्ये स्थिरता, प्रामाणिकपणा, शांती, सहनशीलता आणि चिकाटी या गोष्टी प्रस्थापित केल्याशिवाय हा योग आचरता येणे शक्य नाही, कारण यामध्ये पुष्कळ अडचणींना, समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्यावर निश्चिततपणे व पूर्णत: मात करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात.
– श्रीअरविंद
(CWSA 35 : 597)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…