सद्भावना – १८
अहंकारावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचा पाया झाला पाहिजे, विशेषतः जे जबाबदारीच्या पदांवर आहेत आणि ज्यांना इतरांची काळजी घ्यावी लागते अशांच्या बाबतीत तर त्याची अधिकच आवश्यकता असते. जो प्रमुख आहे त्याने नेहमी उदाहरण घालून दिले पाहिजे, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून ते ज्या गुणांची अपेक्षा बाळगतात ते गुण प्रमुखांनी नेहमीच स्वतः आचरणात आणले पाहिजेत. पदाधिकारी हे समजूतदार, सहनशील, चिकाटी असणारे, सहानुभूती असणारे आणि प्रेमळ, मैत्रीपूर्ण सद्भावना असणारे असले पाहिजेत. अहंभावातून स्वतःसाठी मित्र जिंकणारे नकोत तर, दयाळूवृत्तीने, इतरांना समजून घेण्याच्या आणि मदत करण्याच्या भूमिकेतून मित्र संपादन करणारे असावेत. खरा नेता बनण्यासाठी स्वतःला विसरणे, स्वतःच्या आवडीनिवडी आणि अग्रक्रम विसरणे या गोष्टी आवश्यक असतात.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 164)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…