सद्भावना – १८
अहंकारावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचा पाया झाला पाहिजे, विशेषतः जे जबाबदारीच्या पदांवर आहेत आणि ज्यांना इतरांची काळजी घ्यावी लागते अशांच्या बाबतीत तर त्याची अधिकच आवश्यकता असते. जो प्रमुख आहे त्याने नेहमी उदाहरण घालून दिले पाहिजे, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून ते ज्या गुणांची अपेक्षा बाळगतात ते गुण प्रमुखांनी नेहमीच स्वतः आचरणात आणले पाहिजेत. पदाधिकारी हे समजूतदार, सहनशील, चिकाटी असणारे, सहानुभूती असणारे आणि प्रेमळ, मैत्रीपूर्ण सद्भावना असणारे असले पाहिजेत. अहंभावातून स्वतःसाठी मित्र जिंकणारे नकोत तर, दयाळूवृत्तीने, इतरांना समजून घेण्याच्या आणि मदत करण्याच्या भूमिकेतून मित्र संपादन करणारे असावेत. खरा नेता बनण्यासाठी स्वतःला विसरणे, स्वतःच्या आवडीनिवडी आणि अग्रक्रम विसरणे या गोष्टी आवश्यक असतात.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 164)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…