सद्भावना – १८
अहंकारावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचा पाया झाला पाहिजे, विशेषतः जे जबाबदारीच्या पदांवर आहेत आणि ज्यांना इतरांची काळजी घ्यावी लागते अशांच्या बाबतीत तर त्याची अधिकच आवश्यकता असते. जो प्रमुख आहे त्याने नेहमी उदाहरण घालून दिले पाहिजे, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून ते ज्या गुणांची अपेक्षा बाळगतात ते गुण प्रमुखांनी नेहमीच स्वतः आचरणात आणले पाहिजेत. पदाधिकारी हे समजूतदार, सहनशील, चिकाटी असणारे, सहानुभूती असणारे आणि प्रेमळ, मैत्रीपूर्ण सद्भावना असणारे असले पाहिजेत. अहंभावातून स्वतःसाठी मित्र जिंकणारे नकोत तर, दयाळूवृत्तीने, इतरांना समजून घेण्याच्या आणि मदत करण्याच्या भूमिकेतून मित्र संपादन करणारे असावेत. खरा नेता बनण्यासाठी स्वतःला विसरणे, स्वतःच्या आवडीनिवडी आणि अग्रक्रम विसरणे या गोष्टी आवश्यक असतात.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 164)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…