सद्भावना – १८
अहंकारावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचा पाया झाला पाहिजे, विशेषतः जे जबाबदारीच्या पदांवर आहेत आणि ज्यांना इतरांची काळजी घ्यावी लागते अशांच्या बाबतीत तर त्याची अधिकच आवश्यकता असते. जो प्रमुख आहे त्याने नेहमी उदाहरण घालून दिले पाहिजे, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून ते ज्या गुणांची अपेक्षा बाळगतात ते गुण प्रमुखांनी नेहमीच स्वतः आचरणात आणले पाहिजेत. पदाधिकारी हे समजूतदार, सहनशील, चिकाटी असणारे, सहानुभूती असणारे आणि प्रेमळ, मैत्रीपूर्ण सद्भावना असणारे असले पाहिजेत. अहंभावातून स्वतःसाठी मित्र जिंकणारे नकोत तर, दयाळूवृत्तीने, इतरांना समजून घेण्याच्या आणि मदत करण्याच्या भूमिकेतून मित्र संपादन करणारे असावेत. खरा नेता बनण्यासाठी स्वतःला विसरणे, स्वतःच्या आवडीनिवडी आणि अग्रक्रम विसरणे या गोष्टी आवश्यक असतात.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 164)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…