विचार शलाका – ०२
आपण जेव्हा कधी प्रथमत: युरोपीयन शिक्षण स्वीकारले, तेव्हाच आपण विज्ञानाच्या प्रकाशाद्वारे स्वत:ची दिशाभूल होऊ देण्यास संमती दिली. विज्ञान हा एका मर्यादित खोलीतील प्रकाश आहे, विश्व उजळवून टाकू शकेल असा सूर्य नव्हे. विज्ञानाची सर्व गोळाबेरीज म्हणजे ‘अपराविद्या’ होय पण त्याहून अधिक उच्च अशी एक ‘विद्या’ आहे, महान असे ज्ञान आहे. जेव्हा आपण अपरा विद्येच्या प्रभावाखाली वावरत असतो तेव्हा आपण अशा कल्पनेत असतो की आपणच सर्व काही करीत आहोत आणि जणू काही बुद्धीच सार्वभौम आणि सर्वशक्तिमान असावी असे समजून, आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती बुद्धीच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हा भ्रमाचा आणि ‘माये’चा दृष्टिकोन आहे. एखाद्याने एकदा जरी स्वत:च्या अंतरात वसलेल्या ‘ईश्वरा’ची दिव्य प्रभा अनुभवलेली असेल तर केवळ बुद्धीच सर्वोच्च आहे असे तो पुन्हा कधीच मान्य करू शकणार नाही. तेथे एक उच्चतर ध्वनी असतो, एक अमोघ अशी आकाशवाणी असते. ईश्वराचा अधिवास हा हृदयात असतो. ‘ईश्वर’ मेंदूमार्फत कार्य करतो पण मेंदू हे त्याचे केवळ एक साधन असते. मेंदू ज्या गोष्टीची योजना आखण्याची शक्यता असते ते सर्वप्रथम हृदयाला ज्ञात असते. आणि जो कोणी मेंदूच्या पलीकडे हृदयापर्यंत जाऊ शकतो तोच ‘शाश्वता’ची वाणी ऐकू शकतो.
– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 891-892)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…