ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पुन्हापुन्हा येणाऱ्या अनुभूतींची आवश्यकता

ईश्वरी कृपा – १२

आत्यंतिक जडभौतिक चेतनेला, आत्यंतिक जडभौतिक मनाला चाबकाने फटकारल्यावरच काम करण्याची, प्रयत्न करण्याची आणि प्रगत होण्याची सवय झालेली असते; अन्यथा ते तमस असते. आणि जेव्हा कधी मन कल्पना करते, तेव्हा ते नेहमी अडीअडचणींची, अडथळ्यांची व विरोधाचीच कल्पना करते आणि त्यामुळे गती मोठ्या प्रमाणात मंदावते. सर्व अपयशांच्या पाठीमागे ‘यश’ असते; सर्व वेदना, दुःखभोग, विरोधाभास या साऱ्यांच्या पाठीमागे ‘आनंद’ असतो; सर्व अडीअडचणींच्या पाठीमागे ‘ईश्वरी कृपा’ असते, हे पटवून देण्यासाठी अत्यंत सघन, अत्यंत स्पर्श्य आणि बरेचदा पुन्हापुन्हा येणाऱ्या अनुभूतींची आवश्यकता असते.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 02)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

11 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago