मला भांडणे मंजूर नाहीत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये आणि दोन्ही बाजू या सारख्याच चुकीच्या असतात, हे तुम्ही कायम लक्षात घेतले पाहिजे. आपल्या भावना, अग्रक्रम, पसंती-नापसंती, आपले आवेग यांवर काबू राखणे ही येथील (आश्रमातील) अनिवार्य अशी शिस्त आहे.
*
व्यक्तीने भांडणाला स्वतःहून सुरुवात केली नसली तरी भांडण करणे हे नेहमीच चुकीचे असते.
*
जेव्हा तुम्ही भांडणाला सुरुवात करता तेव्हा, तुम्ही जणू काही ईश्वरी कार्याविरोधात युद्ध पुकारता.
*
हो, भांडणे करणे ही अगदी दुःखद गोष्ट आहे – त्यांच्यामुळे कार्यामध्ये भयंकर बाधा येते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टच अधिक कठीण होऊन जाते.
*
व्यक्तीला स्वतःच्या दोषांबद्दल वाईट वाटणे हे, एक वेळ गरज पडल्यास, स्वतःच्या दोषांमध्ये सुधारणा करण्याच्या संकल्पाचे दृढीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
परंतु इतरांच्या दुराचरणामुळे व्यक्तीला स्वतःला अपमानित झाल्यासारखे वाटणे, याचा आध्यात्मिक जीवनाशी किंवा ईश्वराच्या सेवेशी काही संबंध नाही.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 262-264)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…