मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०९
भावनांनंतर येतात संवेदना. येथे ही लढाई निर्दयी होते आणि समोरचे शत्रू क्रूर असतात. त्यांना तुमच्यातील अगदी लहानातल्या लहान दुर्बलतेचा देखील सुगावा लागू शकतो आणि तुम्ही जेथे संरक्षणविहीन असता तेथे ते शत्रू नेमकेपणाने हल्ला चढवितात. तुम्ही जे विजय मिळविता ते क्षणभंगुर ठरतात आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच लढाया तुम्हाला अनिश्चित काळपर्यंत लढत राहाव्या लागतात. तुम्ही ज्यांना पराभूत केले आहे असे तुम्हाला वाटत असते, ते शत्रू पुन्हा पुन्हा उभे ठाकतात आणि तुमच्यावर हल्ला चढवितात. तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असला पाहिजे; प्रत्येक पराजय, प्रत्येक अस्वीकार, प्रत्येक नकार, प्रत्येक नाउमेद झेलण्याइतकी अथक सहनशीलता तुमच्याकडे असली पाहिजे आणि ऐहिक घटना आणि दैनंदिन अनुभव हे तुमच्या आत्मशोधाच्या नेहमीच विरोधात जाणारे असल्यामुळे, तुम्हाला जरी त्यांचा उबग आला तरी तो शोध चालू ठेवण्यासाठी, तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असणे आवश्यक असते. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 86)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…