मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०९
भावनांनंतर येतात संवेदना. येथे ही लढाई निर्दयी होते आणि समोरचे शत्रू क्रूर असतात. त्यांना तुमच्यातील अगदी लहानातल्या लहान दुर्बलतेचा देखील सुगावा लागू शकतो आणि तुम्ही जेथे संरक्षणविहीन असता तेथे ते शत्रू नेमकेपणाने हल्ला चढवितात. तुम्ही जे विजय मिळविता ते क्षणभंगुर ठरतात आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच लढाया तुम्हाला अनिश्चित काळपर्यंत लढत राहाव्या लागतात. तुम्ही ज्यांना पराभूत केले आहे असे तुम्हाला वाटत असते, ते शत्रू पुन्हा पुन्हा उभे ठाकतात आणि तुमच्यावर हल्ला चढवितात. तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असला पाहिजे; प्रत्येक पराजय, प्रत्येक अस्वीकार, प्रत्येक नकार, प्रत्येक नाउमेद झेलण्याइतकी अथक सहनशीलता तुमच्याकडे असली पाहिजे आणि ऐहिक घटना आणि दैनंदिन अनुभव हे तुमच्या आत्मशोधाच्या नेहमीच विरोधात जाणारे असल्यामुळे, तुम्हाला जरी त्यांचा उबग आला तरी तो शोध चालू ठेवण्यासाठी, तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असणे आवश्यक असते. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 86)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…