मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? ०५
ज्यांची देवावर, त्यांच्या देवावर श्रद्धा आहे आणि ज्यांनी आपले जीवन देवाला वाहिले आहे अशा व्यक्तींसाठी तिसरी एक पद्धत आहे. अशा व्यक्ती पूर्णतः ईश्वराच्या झालेल्या असतात; त्यांच्या जीवनातील साऱ्या घटना या ईश्वरी इच्छेची अभिव्यक्ती असतात आणि अशा व्यक्ती त्या साऱ्या घटना केवळ शांतचित्ताने स्वीकारतात असे नाही तर,त्या घटनांचा स्वीकार त्या व्यक्ती कृतज्ञतेने करतात; कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडते ते त्यांच्या भल्यासाठीच घडते याची अशा व्यक्तींना पूर्ण खात्री असते.त्यांची त्यांच्या देवावर आणि त्याच्याशी असलेल्या नात्यावर एक गूढ, गाढ श्रद्धा असते.देवाला त्यांनी त्यांच्या इच्छेचे पूर्णतया समर्पण केलेले असते आणि जीवन व मृत्युच्या अपघातांपासून संपूर्णतया स्वतंत्र असलेले असे देवाचे अविचल प्रेम व संरक्षण अशा व्यक्तींना जाणवत असते.आपल्या प्रेममूर्तीच्या चरणांशी निःशेषतया आत्म-समर्पित होऊन आपण पडून राहिलेलो आहोत किंवा त्याने त्याच्या हातांचा जणू पाळणा केला आहे आणि त्यात आपण पहुडले आहोत असा सदोदित अनुभव अशा व्यक्ती घेत असतात आणि एक प्रकारचे पूर्ण संरक्षण त्या व्यक्ती सदोदित अनुभवत असतात.त्यांच्या चित्तामध्ये कोठेही भीतीला,चिंतेला किंवा यातनांना जागाच नसते; या साऱ्या गोष्टींची जागा एका शांत, मोदयुक्त आनंदाने घेतलेली असते. परंतु असे अंतःसाक्षात्कारी (mystic) असणे हे प्रत्येकाचेच भाग्य नसते. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 84)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…