मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०२
जीवनाचा अंत होत नाही, पण रूपाचे मात्र विघटन होते आणि या विघटनाचीच शारीरिक चेतनेला भीती वाटत असते. आणि तरीही हे रूप सारखे बदलत राहते आणि मूलत: या बदलास प्रगत होण्यापासून रोखू शकेल असे काहीच असत नाही. हा प्रागतिक बदलच भविष्यात मृत्युची अनिवार्यता नाहीशी करू शकेल. परंतु ही गोष्ट साध्य करणे अत्यंत कठीण आहे आणि त्यासाठी अशा अटी घालण्यात येतात की, ज्या अटींची परिपूर्ती अगदी मोजकी माणसंच करू शकतील. त्यामुळे मृत्युच्या भीतीवर मात करण्याची जी पद्धत अवलंबायची, ती प्रकृतीगणिक आणि चेतनेच्या अवस्थेगणिक वेगवेगळी असेल. या प्रत्येक पद्धतीमध्ये पुष्कळ विविधता आढळत असली तरीही, या पद्धतींचे चार मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते; खरे तर, प्रत्येकाने स्वतःची प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 82)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…