समर्पण – ४१
सत्त्वगुणाचा धोका तेव्हा असतो जेव्हा साधक त्याच्या तर्कबुद्धीच्या एकांगी निष्कर्षाला चिकटून राहतो, किंवा साधनेच्या एखाद्या विशिष्ट क्रियेला, योगामधील एखाद्या विशिष्ट सिद्धीच्या आनंदाला चिकटून बसतो; कदाचित शुद्धतेच्या जाणिवेशी किंवा कोणतीतरी एखादी विशिष्ट शक्ती प्राप्त झाल्यामुळे किंवा ईश्वराशी संपर्क झाल्याच्या आनंदाशी किंवा मुक्तीच्या जाणिवेशी, मुमुक्षत्वाच्या जाणिवेशी, कोणत्यातरी एकाच गोष्टीशी बद्ध होतो आणि मग त्याला दुसरे काहीच नको असते. हे लक्षात ठेवा की, योग हा तुमच्या स्वतःसाठी नसतो, कारण या गोष्टी, जरी त्या सिद्धीचा एक भाग असला तरीदेखील त्या सिद्धीचे उद्दिष्ट असू शकत नाहीत; कारण ईश्वरावर कोणताही हक्क सांगणार नाही आणि त्याच्याकडून जे काही मिळेल ते मी मुक्तपणे स्वीकारीन असा निश्चय तुम्हीच सुरुवातीला केलेला असतो. आनंदाच्या बाबतीत सांगायचे तर, जर ईश्वराची इच्छा असेल तर निःस्वार्थी जीव हा अगदी ईश्वराच्या उपस्थितीचा आनंददेखील सोडून देईल. तुम्ही सर्वोच्च सात्विक अहंकारापासूनदेखील मुक्त असले पाहिजे; मुक्तीच्या इच्छेपासून, मुमुक्षुत्वाच्या सूक्ष्म अज्ञानापासूनदेखील तुम्ही मुक्त असले पाहिजे आणि सर्व प्रकारचे सुख व आनंद या गोष्टी अनासक्तीने स्वीकारल्या पाहिजेत. तेव्हाच तुम्ही गीतेमधील पूर्ण पुरुष किंवा सिद्ध बनाल.
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 85)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…