मानसिक परिपूर्णत्व – ०९
दोन शक्यता असतात. एक म्हणजे वैयक्तिक प्रयत्नांच्या दवारे शुद्धीकरण, पण याला बराच कालावधी लागतो. दुसरी शक्यता म्हणजे ईश्वरी कृपेने त्यामध्ये थेट हात घालणे, ही कृती सहसा अधिक जलद असते. या दुसऱ्या गोष्टीसाठी संपूर्ण समर्पण, आत्मदान यांची आवश्यकता असते. आणि त्यासाठी पुन्हा कशाची आवश्यकता असते तर ती म्हणजे, ईश्वरी शक्तीस कार्य करू देईल इतपत, बऱ्यापैकी शांत राहू शकेल अशा मनाची ! प्रत्येक पावलागणिक संपूर्ण एकनिष्ठ राहून, ईश्वरी शक्तीकार्यास साहाय्यकारी ठरेल असे मन असले पाहिजे, अन्यथा त्याने किमान स्थिर व शांत तरी राहिले पाहिजे. रामकृष्णांनी ज्या मांजरीच्या पिल्लासारख्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला होता, त्या दृष्टिकोनाशी मिळतीजुळती अशी ही दुसरी अवस्था असते. ज्या व्यक्तींना, त्या जे काही करत असतात त्यामध्ये विचार आणि इच्छेच्या द्वारे खूप गतिशील हालचालींची सवय झालेली असते अशा व्यक्तींना या गतिविधी स्थिर करणे आणि मानसिक आत्मदानाची शांतता आत्मसात करणे अवघड जाते. त्यांना योगसाधना करता येणार नाही किंवा ते आत्मदानापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असा याचा अर्थ नाही; मात्र शुद्धीकरण आणि आत्मदान पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांना अधिक कालावधी लागतो; तेव्हा अशा व्यक्तींकडे धीर, स्थिर प्रयत्नसातत्य आणि सर्व गोष्टींच्या पार जाण्याचा निश्चय हवा, असा याचा अर्थ होय.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 83)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…