श्रीअरविंदांच्या क्रांतदर्शी दृष्टीला जे दर्शन झाले होते त्याला मूर्त रूप देण्याचे कार्य श्रीमाताजींवर सोपविण्यात आले होते. नवचेतनेला अभिव्यक्त करणाऱ्या आणि तिला मूर्त रूप देणाऱ्या एका नवीन जगताच्या, एका नव्या मानवतेच्या, एका नवीन समाजाच्या निर्मितीचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. मूलत:च हा एक असा सामूहिक आदर्श आहे की, जो सामूहिक प्रयत्नांसाठी साद घालत आहे; जेणेकरून मानवी पूर्णत्व सर्वांगाने प्रत्यक्षात येईल.
श्रीमाताजींनी केलेली आश्रमाची स्थापना व त्याची उभारणी हे या ध्येयपूर्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते. मानववंशाच्या सामूहिक जीवनात, शरीर आणि अंतरात्मा, प्रकृती आणि पुरुष, पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यात सुमेळ प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा पाया व्यापक करू पाहणारा ऑरोविल हा प्रकल्प होय. ते अधिक बाह्य असे पुढचे पाऊल होय.
*
युनेस्कोसाठी संदेश
अतिमानसिक वास्तवाचे आगमन पृथ्वीवर त्वरेने घडून यावे यासाठी ऑरोविलची निर्मिती आहे.
जग जसे असावयास हवे तसे ते नाही असे ज्यांना वाटते, त्या सर्वांच्या सहकार्याचे येथे स्वागत आहे.
प्रत्येकाला हे माहीत असायलाच हवे की, त्याला मृत्युपंथाला लागणाऱ्या जुन्यापुराण्या जगामध्ये सहयोगी व्हावयाचे आहे का जन्मण्याच्या तयारीत असणाऱ्या नूतन अशा, अधिक चांगल्या जगतासाठी कार्य करावयाचे आहे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 204), (CWM 13 : 215)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…