आश्रम ही मध्यवर्ती चेतना आहे, तर ऑरोविल ही अनेक बाह्य अभिव्यक्तींपैकी एक आहे. दोन्ही ठिकाणी दिव्यत्वासाठीच कर्म केले जाते.
आश्रमवासीयांना त्यांचे त्यांचे कार्य असते आणि ते इतके कार्यव्याप्त आहेत की त्यातील बहुतेकांकडे ऑरोविलला देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र असलाच पाहिजे; कोणत्याही सुयोग्य संघटनेसाठी (Organisation) ही बाब अनिवार्य आहे.
*
प्रश्न : आश्रमाचा आदर्श आणि ऑरोविलचा आदर्श यामध्ये मूलत: कोणता फरक आहे?
श्रीमाताजी : दोहोंमध्ये भविष्यकाळासंबंधीच्या आणि ईश्वरसेवेविषयीच्या दृष्टिकोनात कोणताही मूलभूत फरक नाही.
पण असे समजले जाते की, आश्रमातील लोकांनी त्यांचे जीवन योगासाठी समर्पित केलेले असते; तर ऑरोविलवासी होण्याच्या प्रवेशपात्रतेसाठी, व्यक्तीमध्ये मानवतेच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयोग करण्याचा शुभ संकल्प असणे एवढीच गोष्ट पुरेशी आहे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 205), (CWM 13 : 203-04)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…