आश्रम ही मध्यवर्ती चेतना आहे, तर ऑरोविल ही अनेक बाह्य अभिव्यक्तींपैकी एक आहे. दोन्ही ठिकाणी दिव्यत्वासाठीच कर्म केले जाते.
आश्रमवासीयांना त्यांचे त्यांचे कार्य असते आणि ते इतके कार्यव्याप्त आहेत की त्यातील बहुतेकांकडे ऑरोविलला देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र असलाच पाहिजे; कोणत्याही सुयोग्य संघटनेसाठी (Organisation) ही बाब अनिवार्य आहे.
*
प्रश्न : आश्रमाचा आदर्श आणि ऑरोविलचा आदर्श यामध्ये मूलत: कोणता फरक आहे?
श्रीमाताजी : दोहोंमध्ये भविष्यकाळासंबंधीच्या आणि ईश्वरसेवेविषयीच्या दृष्टिकोनात कोणताही मूलभूत फरक नाही.
पण असे समजले जाते की, आश्रमातील लोकांनी त्यांचे जीवन योगासाठी समर्पित केलेले असते; तर ऑरोविलवासी होण्याच्या प्रवेशपात्रतेसाठी, व्यक्तीमध्ये मानवतेच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयोग करण्याचा शुभ संकल्प असणे एवढीच गोष्ट पुरेशी आहे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 205), (CWM 13 : 203-04)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…