प्रश्न : धर्मसंकल्पनेचा संबंध बरेचदा भगवंताच्या शोधाशी जोडला जातो. फक्त ह्याच संदर्भात धर्म जाणून घ्यावा काय? वस्तुस्थिती पाहता, आजकाल धर्माची इतरही रूपे अस्तित्वात आहेत ना?
श्रीमाताजी : विश्वातील किंवा जगतातील एखादी संकल्पना जेव्हा एकमेवाद्वितीय सत्य या स्वरूपात प्रस्तुत केली जाते तेव्हा तिला आपण ‘धर्म’ असे नाव देतो. त्यावर व्यक्तीने निरपवादपणे श्रद्धा ठेवलीच पाहिजे अशी अपेक्षा असते, कारण बहुतेक वेळी असे सत्य हे जणूकाही ईश्वराच्या दर्शनाचाच परिणाम आहे अशा रीतीने घोषित केले जाते.
बहुतेक धर्म ईश्वराच्या अस्तित्वाला पुष्टी देतात आणि त्याची आज्ञा पाळण्यासाठी नियमही घालून देतात. पण काही धर्म असेही असतात की, जे ईश्वर ही संकल्पना मानत नाहीत. अशा काही सामाजिक – राजकीय संघटनादेखील असतात, ज्या एखाद्या आदर्शाच्या किंवा प्रांताच्या नावाखाली चालतात व त्यांचे अनुशासन पाळावे म्हणून धर्मासारखाच अधिकार सांगतात. तसा त्यांचा दावा असतो.
सत्यशोधन आणि त्याप्रत पोहोचणे यागोष्टी आपापल्या मार्गाने मुक्तपणे अनुसरता येणे हा प्रत्येक मनुष्याचा अधिकारच आहे. परंतु प्रत्येकाला हे ठाऊक असायला हवे की, त्याचा स्वत:चा शोध हा केवळ त्याच्यासाठी चांगला आहे आणि तो त्याने इतरांवर लादता कामा नये.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 207)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…